________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
काय वरती बांधून ठेवले आहे जे तू असे टोकत राहतेस ! गाडी तिलाच सोपून द्यायची. ड्राईवर असता तर टोकल्यावर कळले असते, हा तर घरचा माणूस आहे म्हणून टोकत राहते.
प्रश्नकर्ता : पत्नीची बाजू नाही घेतली तर, घरात भांडणे होतील
४८
ना ?
दादाश्री : पत्नीचीच बाजू घ्यायची. पत्नीची बाजू घेण्यास काही हरकत नाही, कारण पत्नीची बाजू घ्याल तरच रात्री निवांतपणे झोपू शकाल, नाहीतर झोपाल कसे ? तिथे काजी बनू नका.
प्रश्नकर्ता : शेजाऱ्यांचा पक्ष तर नाहीच घेतला पाहिजे ना?
दादाश्री : नाही, तुम्ही नेहमी वादीचेच वकील बना प्रतिवादीचे वकील होऊ नका. तुम्ही ज्या घराचे खाता त्याचेच.... समोरच्याच्या घराची वकीली करता, आणि खाता मात्र ह्या घरचे. म्हणून त्यावेळी समोरच्याचा न्याय मापू नका ! आपली वाईफ अन्यायात असेल तरीही तुम्ही तिच्या प्रमाणे चाला. तिथे न्याय करण्यासारखे नाही की, तुझ्यात अक्कल नाही म्हणून तर.... वगेरे. कारण उद्या जेवायचे इथेच आहे, तु तुझ्याच कंपनीत वकीलात करतोस ! म्हणून प्रतिवादीचा वकील झालास.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान झाले हे कशावरून समजावे ? समोरच्याचे समाधान झाले, पण त्यात त्याचे अहित होत असेल तर ?
दादाश्री : ते तुम्हाला पहायचे नाही. समोरच्याचे अहित होत असेल तर ते त्याला पहायचे आहे. तुम्ही समोरच्याचे हित पहा पण हित-अहित पाहण्याची शक्ति आहे का तुमच्यात ? तुम्ही स्वत:चेच हित पाहू शकत नाही, तर मग दुसऱ्यांचे हित कसे पाहू शकाल ? सर्व आपापल्या क्षमतेनुसार हित पाहत असतात, तेवढे पाहिले हित पाहिजे. परंतु समोरच्याच्या हितासाठी वादविवाद उभे होतील, असे व्हायला नको.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान करण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु परिणाम विपरीत येणार आहे, असे आपल्याला माहित असेल, तेव्हा काय करावे ?