________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
४७
सारे कुटुंब अडचणीत येईल आणि गुरु केल्यावर स्वतःसुद्धा अडचणीत येईल. त्याला पण खेळण्यासारखे खेळावे लागते ना?! पण माझ्याकडे येणाऱ्यांचे असे होत नाही. माझ्याकडे ऑल राइट ! हिंसकभावच उडून जातात ना ! हिंसा करण्याचा विचारही येत नाही. दुसऱ्यांना कसे सुख देता येईल हाच विचार येतो !
नवीन नवरीसोबत पण नीट वागावे लागते. सर्वकाही नवीन नवीन असेल तर सांभाळून घ्यायला हवे. पहिल्याच दिवसी पत्नी रुसली आणि तुम्ही सुद्धा रुसलात तर केव्हा पार येणार. कदाचित पत्नी रुसली असेल तर तुम्ही हळूच तिला सांगा, 'घाबरु नकोस, आपण दोघे एकच आहोत.' कसेही करुन समाजावून उमजावून समाधान करा. ती पण रुसेल आणि तु पण रुसलास मग काय उरले ? काम घेता तर आले पाहिजे ना!
प्रश्नकर्ता : या स्त्रिया काम करुन खूप थकून जातात. काही काम सांगितले, तर बहाणे बनवतात की, मी आज खूप थकले आहे, माझे डोके दुखत आहे, कंबर दुखत आहे.
दादाश्री : असे असेल ना, तर आपण तिला सकाळीच सांगायचे की, हे बघ तुझ्याने काम होणार नाही, तू थकली आहेस. तेव्हा तिला जोश येईल की नाही, तुम्ही चुपचाप बसा मी करुन घेईल. अर्थात् तुम्हाला कलेने काम घेता आले पाहिजे. अरे! भाजी चिरण्याचीही कला नसेल ना, तर रक्त निघेल.
प्रश्नकर्ता : आम्ही जेव्हा गाडीने जातो तेव्हा ती मला सारखी बडबड करत राहते की, गाडी कुठून वळवावी, ब्रेक केव्हा लावावा, असे गाडीत मला बोलतच राहते, सतत टोकत राहते. गाडी अशी चालवा, तशी चालवा!
दादाश्री : तर मग तिच्याच हातात द्या ना, गाडी तिला सोपवून द्या. भानगडच नाही, शहाणा माणूस! किट-किट करत असेल तर तिला म्हणावे, घे बाई, तु चालव!
प्रश्नकर्ता : तेव्हा ती म्हणेल, 'माझ्यात तर हिम्मत नाही.' दादाश्री : तेव्हा विचारा, का? त्यात तुला काय हरकत आहे ? तुला