________________
भावना सुधारे जन्मोजन्म
२३
पण सुपारी खातांना सांगतो की हे खोकल्याचे औषध आहे. त्या कित्येक वेळी 'नाही' म्हटल्या तर राहून देतो आणि मग म्हणाल्या की 'घ्या', तेव्हा मी घेतो तर खोकला होतो. तसे पाहिले तर मी सुपारी खात नाही. मला कुठल्या ही वस्तुची सवय नाही. परंतु माल भरलेला असेल तर खाल्ले जाईल ना?
आपले हे 'अक्रम विज्ञान' आहे ! तर मागच्या सवयी पडलेल्या आहेत, त्यामुळे होते. म्हणून ही शक्ति मागा. मग लुब्ध आहार घेतला, त्याची हरकत नाही पण हे कलम अनुसार बोलण्याने जुने करार मोकळे
होतात.
प्रश्नकर्ता : जी आपली प्रकृति आहे, जर गुणाकार कराल तर ती वाढत जाईल. तिला भागायला पाहिजे. प्रकृतिला प्रकृतिने भागायला पाहिजे हे समजवा.
दादाश्री : म्हणजे ही कलमे बोलत राहिल्याने त्याचा भागाकार होतो आणि कमी होऊन जाते. अशी कलमे बोलली नाही तर (प्रकृतिरूपी) रोपटे आपणहून च उगत राहणार. आणि हे बोल बोल केले तर कमी होऊन जाईल. हे जसेजसे बोलाल, तसेतसे आत प्रकृतिचे गुणाकार झालेत ते तुटून जातील आणि आत्माचे गुणाकार होईल. आणि प्रकृतिचे भागाकार होईल. म्हणून आत्मा पुष्ट होत जातो. नव कलमे रात्रंदिवस बोल बोल करा, टाईम मिळाला तर ! रिकामा वेळ मिळाला की बोलावे. आम्ही तर सर्व औषध देऊन टाकतो, सर्वकाही समजावतो, मग जे करायचे असेल ते...
प्रत्यक्ष-परोक्ष, जीवंत-मृत्यु पावलेल्यानां.... प्रश्नकर्ता : ८. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा, प्रत्यक्ष अथवा परोक्ष, जीवंत अथवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार,