________________
भावना सुधारे जन्मोजन्म
अर्थात् हे भाव तेरा ने गुणीले. आता ह्या भावला उडवायचे असेल तर त्याला तेरा ने भागून टाकावे म्हणजे उडून जातील आणि नव्याने भाव उत्पन्न नाही होऊ दिले म्हणजे ते खाते बंद होऊन गेले. नवीन इच्छां नाही आहेत म्हणून खाते बंद होऊन गेले. खाते सील केले पाहिजे.
... तेथे प्रकृतिची शून्यता
प्रश्नकर्ता : शुद्धात्माचे ज्ञान तर दिले. आता ही प्रकृतिची शून्यता प्राप्त करण्यासाठी हे नव कलमे बोलली, तर हेल्प करते का?
२२
दादाश्री : हो, हेल्प तर होते, जेवढ्याने गुणीले तेवढ्याने भागावे. मला डॉक्टर सांगतात, ‘हे खात जा.' मी सांगितले. 'डॉक्टर, ही गोष्ट दुसऱ्या दर्दीना सांगा. हा आमचा गुणाकार वेगळ्या प्रकारचा आहे. मला ते भागाकार करायचे सांगतील ते कशा प्रकारे जुळेल'.
प्रश्नकर्ता : तुम्ही तर उलट मिरच्या अधिक प्रमाणात घेऊन भागाकार करतात ?
दादाश्री : मिरच्या घेते वेळी मी सर्वांना सांगतो की हे खोकल्याचे औषध करतो आहे अणि खोकला झाला की दाखवतो की पहा झाला ना खोकला ?
प्रश्नकर्ता : यामध्ये भागाकार कुठे आला?
दादाश्री : तोच भागाकार. मिरच्या जर नसत्या घेतल्या तर भागाकार पूर्ण नसता झाला.
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रकृति मध्ये आधी जे भरले आहे, ते आता पूर्ण करायचे आहे.
दादाश्री : होय पूर्ण करून घ्यायचे.
ह्या नीरूबेननां मी सांगतो, 'तुम्ही सांगत असाल तर सुपारी खाईन. '