________________
२४
भावना सुधारे जन्मोजन्म
नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
दादाश्री : अवर्णवाद म्हणजे एखाद्या माणसाची बाहेर आलू चांगली असेल, मान असेल, कीर्ति असेल, तर त्यास आपण उलट बोलून बेआब्रु केले असेल, त्याला अवर्णवाद म्हणायचे. अर्थात् त्याचे उलट बोलणे.
प्रश्नकर्ता : ह्यात मेलेल्यांची पण आपण क्षमायाचना करतो, आपण जे काही संबोधन करतो, ते त्यांना पोहचते खरे?
दादाश्री : त्यांना पोहचावयाचे नाही. तो माणूस मरुन गेला आणि तुम्ही आता त्याच्या नांवाने शिव्या दिल्या, तर तुम्ही भयंकर दोषात पडाल. म्हणून आम्ही म्हणतो की मेलेल्यांचे ही नांव नाही घ्यायचे. बाकी पोहचणे न पोहचण्याचा प्रश्न नाही. वाईट माणूस असेल आणि सर्व उलटे करुन मरुन गेला, तरी पण मागाहून त्याचे वाईट नाही बोलायचे.
आता रावणाचे वाईट नाही बोलायचे. कारण की तो अजून देहधारी आहे (दूसऱ्या जन्मात). म्हणून त्याला 'फोन' पोहचून जाईल. 'रावण असा होता नी तसा होता' बोललो तर ते त्याला पोहचून जाईल. (आपली स्पंदन त्याचा आत्मा जेथे असेल तेथे पोहचून जातात.)
आपले कोणी नातेवाईक मरुन गेले असेल आणि लोक त्याची निंदा करत असतील, तर आपण मध्ये नाही मिसळायचे. जर मिसळलात तर पश्चाताप करावा की असे नाही झाले पाहिजे. कोणी मरुन गेलेत्या माणसाच्या गोष्टी करणे हा भयंकर गुन्हा आहे. जो मरुन गेला असेल, त्यालाही आपली लोकं सोडत नाहीत. असे करतात की नाही करत लोकं ? असे करायला नाही पाहिजे. असे आम्ही सांगण्यास मागत आहोत. ह्यात खुप मोठे जोखीम आहे. त्यावेळेस पहिल्याच्या 'ओपिनियन'(अभिप्राय) मुळे बोलले जाते. म्हणून ही कलमे बोलत जा. त्यामुळे त्या गोष्टी बोलल्या गेल्या तर दोष नाही लागणार. हा हुक्का पीत जाऊ आणि बोलत जाऊ की 'नाही प्यायचे,