________________
'दर्शन' नामक चैतन्यगुणाला आवृत करते. (३) वेदनीय कर्म जीवाला सुख-दुःखरूप वेदन (जाणीव) निर्माण करते. (४) मोहनीय कर्म विवेकशक्ती मूर्च्छित करते. अनेक विकार निर्माण करते. बुद्धी भ्रष्ट करते (५) आयुकर्माच्या योगाने जीवाचे त्या त्या गतीतील आयुष्याचे निर्धारण होते. (६) नामकर्माने जीवांची शारीरिक व मानसिक लक्षणे ठरत असतात. याचे पुष्कळ उपप्रकार आहेत. (७) गोत्रकर्माच्या योगाने जीव लोकपूजित अथवा लोकनिंदित कुळात जन्मतो. (८) अंतराय कर्मामुळे जीवाच्या भोगोपभोगांमध्ये बाधा उत्पन्न होते.
कर्माचा बंध' ही जशी एक अवस्था आहे तशीच सत्त्व, उदय, उदीरणा इत्यादी दहा अवस्थांचा जैन शास्त्रात विचार केलेला दिसतो. वरील आठ कर्मांची ‘अत्यंत घातक' आणि कमी घातक' अशीही वर्गवारी केलेली दिसते.
जैनांच्या कर्मसिद्धांताच्या एकंदर मांडणीवरून असे दिसते की ह्यातून कार्य-कारण संबंध स्पष्ट होतो. हा सिद्धांत पूर्ण नियतिवादीही नाही आणि सर्वथा स्वच्छंदवादीही नाही. मनुष्याला त्यांनी पूर्वकृत कर्मांचे उत्तरदायित्व स्वीकारायला भाग पाडले आहे. वर्तमान परिस्थितीत पुरुषार्थाला वाव देऊन परिस्थितीत बदल घडवून आणण्यासही वाव दिला आहे. खऱ्या अर्थाने कर्मसिद्धांत जैन धर्माचा कणा आहे.
(ग) अनेकांतवाद-नयवाद-स्याद्वाद :
जैनांनी काया-वाचा-मनाने अहिंसेचा पुरस्कार केला आहे. सैद्धांतिक विवेचन करतानाही सर्वसमावेशक, सौम्य दृष्टिकोण स्वीकारला आहे. विरोधकांचा दृष्टिकोण कठोरपणे धुडकावून न लावता, तो एका मर्यादित अर्थाने कसा खरा आहे, हे दाखवण्याकडेच जैन आचार्यांचा कल होता. त्यातूनच जैनांनी नयवाद, स्याद्वाद आणि अनेकांवाद हे तीन परस्परसंबंधित असे सिद्धांत सांगितले. हे तीनही एकमेकांना पूरक आहेत. परंतु एकरूप नाहीत. या सर्वांमधला समान धागा असा की हे वैचारिक सामंजस्य स्थापण्याचे प्रयत्न आहेत. ____ विश्वातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना ‘अनंतधर्मात्मक' असते. शिवाय त्याकडे बघणाऱ्याच्या दृष्टीही भिन्न भिन्न असतात. 'नय' म्हणजे नेणारा ; वस्तू, व्यक्ती किंवा घटनेच्या स्वरूपाकडे' नेणारा दृष्टिकोण अथवा अभिप्राय. तत्त्वत: वस्तू इ. जशा अनंतधर्मात्मक आहेत तसेच 'नय'ही तत्त्वत: अनंत आहेत. सामान्य व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी सात प्रकारचे 'नय' अथवा 'अभिप्रायाच्या दृष्टी' सांगितल्या आहेत.
एकाच वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोणातून, भूमिकेतून बघतो त्यावर आपली मते ठरत असतात. यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांचा दृष्टांत सुप्रसिद्ध आहे. या दृष्टांतात ते आंधळे आहेत म्हणून त्यांची मते एकांगी आहेत. कित्येकदा आपण डोळस, बुद्धिमान असूनही केवळ आपलीच मते योग्य मानतो. इतरांच्या मतांची उपेक्षा करतो. आपल्या सीमित बुद्धीने एकांगी मताचा आग्रह न धरता 'रिअॅलिटी'कडे विविध पैलूंनी बघण्याचे सामर्थ्य आपल्यात विकसित करणे म्हणजे अनेकांतवादी' बनणे होय. ___'अनेकांतवाद' शब्दातील 'वाद' म्हणजे सिद्धांत. 'अंत' शब्द 'टोक, दृष्टी, मत, अभिप्राय' या अर्थांचा सूचक आहे. 'एकांतवाद' म्हणजे हठाग्रही, पक्षपाती दृष्टी. अनेकांतवादी व्हावयाचे असल्यास प्रथम हे लक्षात ठेवावे की विश्वातील कोणतीच गोष्ट निरपेक्षपणे 'सत्' अगर 'असत्' नसते. अनेकांतवादी निर्दोष दृष्टीने मतप्रदर्शन करताना प्रत्येक विधानाला ‘स्यात्' (कदाचित्, कथंचित्, संभवत:) असे पद जोडावे लागते. 'स्यात्' हे पद संशयवाचक नसून सापेक्षतादर्शक आहे. आपल्याला वस्तूचे वर्णन करताना ‘स्यात् अस्ति', 'स्यात् नास्ति' आणि 'स्यात् अवक्तव्यम्' ही तीन पदे आणि त्यांच्या परम्युटेशनने बनणारी एकूण सात पदे उपयोजित करावी लागतात. त्याला स्याद्वाद म्हणतात. या सात आणि सातच भंगांनी (प्रकारांनी) वस्तूचे समग्र स्वरूप व्यक्त होते असे जैन दार्शनिकांचे आणि तार्किकांचे मत आहे. __काही अभ्यासकांनी 'नयवाद' आणि 'स्याद्वाद' हे ‘अनेकांतवादा'चे दोन पंख आहेत असे म्हटले आहे.
मी स्याद्राद' व 'अनेकांतवादा'ला एकाच नाण्याच्या दोन बाज म्हटले आहे. अनेकांताच्या द्वारे जैनांनत्रैयक्तिक, कौटुंबिक, धार्मिक व सामाजिक-सांस्कृतिक सहजीवनात सामंजस्य स्थापण्याचा प्रयत्न केला. जगभरातील