________________
५६८
टीपा
-- जैन धर्मात २४ तीर्थंकर मानले जातात. त्यांत शांतिनाथ हा एक तीर्थंकर आहे.
४४२ श्लोक १ :- काशीला जाऊन (नंतर) उज्जयिनीला जाऊन, जे नर मरण पावतात, ते परम पदी जातात; इतर तीर्थांचे नाव (सुद्धा) काढू नको.
येथे गम्पिणु व गम्पि यांमध्ये एप्पिणु व एप्पि यांतील आदि एकाराचा लोप झाला आहे. परावहि -- सू.४.३८२.
श्लोक २ :- जो गंगेला जाऊन आणि काशीला जाऊन मरण पावतो, तो यमलोकाला जिंकून, देवलोकात जाऊन, क्रीडा करतो.
येथे गमेप्पिणु व गमेप्पि यांमध्ये एप्पिणु आणि एप्पिमधील आदि एकाराचा लोप झालेला नाही. सिवतित्थ -- काशी. कीलदि -- कील (सू.१.२०२) पुढे दि प्रत्यय (सू.४.२६०) आला आहे. जिणेप्पि -- सू.४.४४०. जिण :- सू.४.२४१ पहा.
४४३ तृनः प्रत्ययस्य -- धातूपासून कर्तृवाचक नामे सिद्ध करण्याचा तृन् हा
प्रत्यय आहे. श्लोक १ :- मारणारा हत्ती, सांगणारे लोक, वाजणारा पटह, भुंकणारा कुत्रा.
येथे मारणउ, बोल्लणउ, वज्जणउ, भसणउ यांमध्ये अणअ असा 'तृन्' चा आदेश आहे. पडह -- वाद्यविशेष; नौबत, नगारा.
४४४ नं मल्ल....करहिं -- येथे नं हा इवार्थी आदेश आहे.
श्लोक १ :- सूर्यास्ताचे वेळी व्याकुळ चक्रवाक पक्ष्याने कमळाच्या देठाचा (मृणालिका) तुकडा घशात घातला, (पण) तोडला (खाल्ला) (मात्र) नाही; जणु जीवाला जाऊ न देण्यासाठी अडसर घातला.
श्लोक २ :- बांगड्या गळून पडतील या भीतीने सुंदरी हात वर करून