________________
( १३८) धर्माची ध्वजा पृातील सर्व राष्ट्रांत्र उभी राहण्यास कोणतीही हरकत येणार नाही. एकाकाली हिंदुस्तानांतील या दोन धर्मात थोडासा विरोध होता. पण त्या विरोधाने जी कामगिरी व्हावयाची ती झाली असून हल्लीचा असा काल आला आहे की वैदिक धर्मी लोकही आचाराने जैन धर्मी आणि जैनधर्मी लोकही तत्वज्ञानाने वैदिक धर्मी झालेले आहेत. ही स्थिती लक्षात आणून जर दोघांनीही आपल्या उन्नतीसाठी प्रयत्न केला तर तो अधिक फलद्रूत होईल हे आह्मी सांगावयास पाहिजे असे नाही.
अशा दृष्टीने विचार केला म्हणजे जैन परिषदेने काय काम करावयाचे याची दिशा आपोआप ठरली जाते. वैदिक धर्मातील लोकां मध्ये रूढ असले ल्या सामाजिक चाली सुधारण्याचा हल्ली जो प्रयत्न चालु आहे त्यां पैकी वराच भाग जैन लोकांस लागु पडत नाही. बालविवाह किंवा ज्ञातीभेद हे जैन समाजांत रूढ नाहीत. स्त्रीशिक्षण किंवा परदेशगमन यां बद्दल थोडी बहुत चळवळ करावी लागेल; पण त्यांस जैन धर्माचा कोणताहि प्रत्यवाय नाही. उलट पूर्वी पासून या धर्माची शिस्तच अशी आहेकी, दुसऱ्या धर्मातील लोक या धर्मात घेता येतात. परदेशगमन जैन धर्मीयांस निषिद्ध आहे अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे; किंबहुना अहिंसातत्त्वाचा सर्व जगभर प्रसार करणे हे जैन धर्माचे, आणि त्यांचा आचार जर वैदिक धर्मीयोर्नी घेतला आहे तर त्यांचेही कर्तव्य होय. या करितां जैन परिषदेस आमची अशी सूचना आहे की, हे काम त्यांनी नेटाने हातांत् घ्यावें. राष्ट्रीय प्रगतीस मांसाहाराची अपेक्षा आहे असें में कित्येकांचे मत आहे ते अगदी चुकीचे आहे. हर्बर्टस्पेन्सर सारखें तत्त्वज्ञानी या सही एकदां अहिंसा तत्त्व मान्य झालेले होते. पण देहास लागलेली पिढीजाद सवय त्यांच्या हातून सुटेना. अहिंसा धर्माची योग्यता एवढ्यावरूनच कळून येणार आहे, व आमची अशी खात्री आहे की, याचा सर्वत्र प्रसार करण्याची जर जैन धर्मी आणि वैदिक धर्मी लोकांनी खटपट केली तर त्यांस यश आल्या खेरीज कधीही राहणार नाही. हिंदुस्थानांतील लोकांस बाटविण्यास रोमन केथोलीक किंवा प्रोटेस्टंट लोक ज्याप्रमाणे एक होतात तसे अहिंसा धर्माचा प्रसार करण्यास जैन व वैदिक धर्मी या दोघानीही एक झाले
पाहिजे
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org