SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 69
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (२७) की, सांख्य या जगतास नित्य मानतात, व सर्व पदार्थ सर्वत्र आहेत अशी त्यांची कल्पना आहे. जसें उदाहरणार्थ वीजामध्ये वृक्ष पाने, फुले व फळे आहेत. यद्यपि वीजापासून अंकुर तदनंतर पाने फुले व फळे ही कालक्रमानें उत्पन्न होत असतात, तथापि ही सर्व त्या बीजामध्ये प्रथमच सांठऊन राहिली आहेत. ही जर बीजामध्ये नसती तर पुढे यांचा आविर्भाव झाला नसतां यासाठी उपादान कारणामध्ये त्यापासून उत्पन्न होणारी सर्व कार्य प्रथमपासूनच अस्तित्वात आहेत. असे नसते तर मनुप्याने उपादान कारणांचा स्वीकारच केला नसता. जसें साळीपासून पुढे साळीच उत्पन्न होतात तेव्हां पुढें साळी [ भात ] उत्पन्न होण्यास कारण साळी यांचा आपणांस निश्चय झाल्यामुळे आपण निःसंशय होऊन साळी पेरतो कारण त्यांपासून साळीच उत्पन्न होतात. साळीपासून साळी उत्पन्न झाल्या नसत्या तर आपण कोद्रव बीज देखील साळी उत्पन्न होण्यासाठी पेरले असते. यास्तव कारणामध्ये कार्य हे पूर्वीच सांठऊन राहिले आहे. सहकारी कारणे मिळाली झणजे कार्याचा आविर्भाव होतो व तदभावी ती त्या कारणामध्येच गुप्त असतात झणजे त्यांचा तिरोभाव होतो. सहकारी कारणे केवळ अभिव्यंजक आहेत. ती मिळाली ह्मणजे काय हे आपण होऊन आपले स्वरूप प्रकट करितं. एवढ्या विवेचनावरून सांख्य हे सत्कार्यवादी आहेत असे सिद्ध होते. त्यांचे खण्डन करण्याकरिता आचार्यानीं श्लोकांत अनित्य या शब्दाचा प्रयोग केला आहे. येथे 'अनित्य' शब्दाने सर्वधा जगत् अनित्य आहे असे केव्हाही समजू नये, कारण, सर्वथा अनित्य किंवा सर्वथा नित्य असा. कोणताच पदार्थ माहीं असें स्याद्वाद सांगतो. कथंचिन्नित्यानित्यात्मक तत्व आहे असा बैनांचा सिद्धान्त आहे. तेव्हा Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003839
Book TitleSwayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Original Sutra AuthorN/A
AuthorSamantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
PublisherSakharam Nemchand Doshi
Publication Year
Total Pages314
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy