________________
प्राप्त होते. अशुद्ध पार्श्वभाग, शरीर व इतर विषयांच्या संबंधाने होतात. हे संबंध असले झणजे मनुष्य जरी मृत्युरोगादिकापासून भीतो तथापि ते त्याचा अवश्य पाठलाग करितात. यास्तव मृत्युरोगादिकांचा जेव्हां पूर्ण नाश होतो तेव्हांच आपली भोवतालची परिस्थिति पूर्ण शुद्ध व सुखयुक्त होते.
८ चंद्रप्रभ हे नांव सार्थक आहे. यांनी आत्म्यास मलिन करणान्या कषायांचा नाश करून आपल्या आत्म्याचे स्वरूप चंद्राप्रमाणे निर्मल बनहिले.
९ पुष्पदंत अथवा सुविधि यांनी पदार्थांचे स्वरूप खोट्या एकां. ताचे खंडन करील असें वर्णिले. पदार्थातील एकत्र व अनेकत्व धर्म हे त्या पदार्थापासून सर्वथा वेगळे किंथा अभिन्न नाहीत असे सांगितले. वाक्यामध्ये गौण अर्थ कोणता व मुख्य अर्थ कोणता समजावा याचे हि यांनी प्रतिपादन केले. पदार्थांचा योग्य विधि--- ह्मणजे स्वरूप, तें यांनी दाखऊन दिले.
१०२ १० शीतल जिनेश्वरांनी सांसारिक सुखाशारूपी अग्नीने होरपडणारे आपले मन ज्ञानरूपी पाण्याने शांत केले. भव्य जनांनाही हाच उपाय सांगून त्यांच्या मनालाही शांति प्रदान केली. जन्म व जरा यांचा नाश व्हावा हाच शीतल जिनाचा उद्देश होता. यांनी सर्वांना शांतीचा उपदेश दिला यामुळे यांचे शीतल नांव सार्थक आहे. १२२
११ श्रेयोमार्गामध्ये यांनी भव्यांना आपल्या उपदेशाने स्थिर केलें यास्तव यांचे श्रेयान् हे नांव योग्य आहे. या श्रेयान् जिनांनी वस्तूंतील धर्मांना मुख्यता व गौणता केव्हां प्राप्त होते हे सांगून श्रेयोमार्ग दाखविला.
१३१ १२ पूज्य अशा जिनेश्वराची पूजा करण्याने जरी थोडेसें पातक होते, तथापि पुण्यपाप्ति पुष्कळ होते. तसेच आपलें परिणाम शुभ
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org