________________
(१३)
ब आपल्या मागें अभंगरूपीं वाणीनें उपदेशामृत पाजीतच आहेत. शिवाय मांसाहार करणाऱ्याची बुद्धि घातकी, दुष्ट रागीट अशी बनते. व वनस्पतिजन्य अन्नाचा आहार करणाऱ्या मनुष्याची बुद्धि नेहमी शांत व विचारी असते.
आतां आपण धर्मशास्त्रदृष्ट्या विचार करूं, झणजे धर्मशास्त्रकारांनी मांस खाण्याबद्दल काय सांगितलें आहे तें कळेल.
आपण हिंदुधर्मशास्त्रकाराचें काय झणणे आहे
प्रथम
पाहूं.
याज्ञवल्क्य स्मृतींत धर्माची दहा लक्षणें सांगितळी वीं येणेंप्रमाणे::---
अहिंसा सत्यमस्तेयं शौचमींद्रियनिग्रहः । दानं दया दमः शांतिः सर्वेषां सर्व साधनम् ॥
हिंसा न करणे, सत्य बोलणें, चोरी न करणें, पवित्रता ठेवणे, इंद्रिय दमन करणे, परोपकार करणे, दया करणे, मनोनिग्रह करणें, क्षमा करणें वगैरे ह्रीं धर्माची दहा लक्षणे आहेत.
यावरून
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com