________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दहाचे केले एक हे जग 'रिलेटिव्ह आहे,' व्यवहारिक आहे. आपण समोरच्याला एक अक्षर सुद्धा बोलू नये आणि जर 'परम विनयात' असाल तर खुसपटही काढू नये. या जगात कुणाचीही खुसपट काढण्यासारखे नाही. खुसपट काढल्याने कोणता दोष लागतो हे खुसपट काढणाऱ्याला माहीत नाही.
कोणाचीही टीका करणे म्हणजे आपली दहा रुपयाची नोट वटवून एक रुपयाची नोट मिळवण्यासारखे आहे. टीका करणारा नेहमी स्वत:चेच गमावत असतो. ज्यामुळे काहीच हाती लागत नाही, अशी मेहनत आपण करु नये. टीकेमुळे तुमचीच शक्ती वाया जाते. आपल्याला जर दिसले की हे तीळ नाही पण रेतीच आहे, तर मग रेतीला पिळण्याची मेहनत का करावी? 'टाइम एन्ड एनर्जी' (वेळ आणि शक्ती) दोन्ही वाया जातात. हे तर टीका करुन दुसऱ्यांच्या कपड्यांचा मळ धुतला आणि स्वतःचे कपडे मळवलेस! ते आता केव्हा धुशील!?
कुणाचेही अवगुण पाहू नये. पाहायचेच असतील तर स्वत:चे पाहा ना! दुसऱ्यांच्या चुका पाहिल्याने आपली बुद्धी कशी होत जाईल! त्यापेक्षा दुसऱ्यांचे गुण पाहिले तर मन कसे खुश होत असते!
सर्व दुःखांचे मूळ 'स्वतःच' समोरच्यांचे दोष कुठेही नाहीच, समोरच्यांचा काय दोष? ते सर्व तर हेच मानून बसले आहे की, हा संसार, हेच सुख आहे आणि हीच खरी गोष्ट आहे. आपण त्यांना समजवायला गेलो की ही तुमची मान्यता चुकीची आहे, तर ती आपलीच चूक आहे. लोकांना दुसऱ्यांच्या चुका पाहण्याचीच सवय लागली आहे. कुणाचेही दोष नसतातच. बाहेर तर तुम्हाला वरण-भात, भाजी-पोळी, आमरस-पुरी सर्व काही बनवून जेवायला वाढतात, वरुन तुपही सोडतात, गहू निवडतात, तुम्हाला कळतही नाही. गहू निवडून दळून आणतात. जर कधी बाहेरची दुःख देत असतील तर गहू कशाला निवडतील? अर्थात बाहेरचे कोणी दुःख देत नाही, तुमचे दु:ख आतूनच येत आहे.