________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : एक साहेब तपकीर ओढत होते, असे करुन! मी म्हणालो, साहेब ही तपकीर ओढणे तुमच्यासाठी आवश्यक आहे का? तेव्हा ते म्हणाले, 'तपकीर ओढण्यात काही हरकत नाही.' मी (मनातल्या मनात) म्हणालो, या साहेबांना हे माहीतच नाही की ते या तपकीरीचे आयुष्य वाढवत आहेत! कारण आयुष्य म्हणजे काय? तर कुठलाही संयोग असेल तो त्याचा वियोग होण्याचे नक्की झाल्यानंतरच जुळून येतो. आणि हे तर जे नक्की झालेले आहे त्याचे परत अशाप्रकारे आयुष्य वाढवतात! कारण जिवंत मनुष्य, हवे तितके कमी-जास्त करत राहतो, मग शेवटी काय होणार?! तर हे सर्व चुकांचे आयुष्य वाढवतच आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांचे रक्षण करत असतात की 'यात काही हरकत नाही, आम्हाला तर स्पर्शतच नाही.' चुकीच्या गोष्टींचे रक्षण करणे हा तर भयंकर गुन्हा आहे.
प्रश्नकर्ता : आणि जे शुष्क अध्यात्म्यात खोलवर उतरलेले असतील ते असे सांगतात की आत्म्याला काही स्पर्शत नाही. हे तर सर्व पुद्गलचे आहे.
दादाश्री : असे तर इथे पुष्कळ आहेत. गोल-गोल, गोल-गोल फिरवतात. त्यातलाच माल, त्यास शुष्क म्हटले जाते.
सर्व ऐकल्यानंतर मग मी सांगतो की भगवंताने सांगितले आहे की इतकी लक्षणे पाहिजेत. मृदुता, ऋजुता, क्षमा! इथे तर मृदुता दिसत नाही. ऋजुता दिसत नाही, असा तर ताठपणा आहे!
ताठा आणि आत्मा यात तर खूप अंतर आहे.
इथे तर नुसती पोलंपोल चालत असते. हे लोक उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणून मग हे सर्व खोटेनाटे चालवतात. पण माझ्यासारखे तर उत्तर देतातच ना? लगेचच उत्तर देतात. बिरबलासारखे, अगदी हजरजबाब.
दोष स्वीकारा, उपकार मानून आमच्यात जराही आडमुठेपणा नसतो, कोणी आम्हाला आमची