________________
जग निर्दोष
१४७
नाही बघत दादा दोष कुणाचे तुमचे दोष सुद्धा आम्हाला दिसतात पण आमची दृष्टी शुध्दात्म्यावर असते, उदय कर्माकडे दृष्टी नसते. आम्हाला सगळ्यांचेच दोष लक्षात येतात पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही, म्हणून कविने लिहिले आहे की,
'मा कदी खोड काढे नही, दादानेय दोष कोईना देखाय नही.'
('आई कधी खोड काढत नाही, दादांनाही कुणाचे दोष दिसत नाहीत.')
मला आता कोणी शिव्या दिल्या आणि नंतर म्हणेल, 'साहेब, मला माफ करा.' अरे भाऊ, आम्हाला माफी द्यायची नसते. माफी तर आमच्या सहज गुणातच असते. आमचा स्वभावच सहज होऊन गेलेला आहे की जो माफीच देत असतो. तू काहीही केलेस तरीही माफीच असते. ज्ञानींचा तो 'स्वाभाविक गुण' बनून जातो. आणि तो आत्म्याचा गुण नाही, आणि देहाचाही गुण, ते सर्व व्यतिरेक गुण आहेत. __या गुणांवरुन आपण अंदाज काढू शकतो की, आत्मा इथपर्यंत पोहोचला. पण तरीही हे आत्म्याचे गुण नाहीत. आत्म्याचे स्वत:चे गुण तर थेट तिथपर्यंत सोबत जातात, ते सर्व गुण आत्म्याचे. आणि व्यवहारात हे जे आम्ही सांगतो ती त्याची लक्षणे आहेत. आपण कुणाच्या थोबाडीत मारले आणि ते आपल्याशी हसत मुख असतील तर आपल्या लक्षात येते की त्यांना सहज क्षमा आहे. तेव्हा आपल्याला समजते की गोष्ट खरी आहे.
तुमची निर्बळता आम्ही जाणत असतो. आणि निर्बळता असतेच. आमची सहज क्षमा असते. क्षमा द्यावी लागत नाही, सहजपणे मिळून जाते. सहज क्षमा गुण म्हणजे अंतिम दशेचा गुण. आमच्याकडे सहज क्षमा असते. एवढेच नाही, पण आम्हाला तुमच्यासाठी निरंतर एकसमान