________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : म्हणजे निर्दोष आहे तरी पण हे असे कशामुळे घडते? एकीकडे आम्ही उघडपणे सांगत असतो की संपूर्ण जग निर्दोष आहे आणि दुसरीकडे हे असे शब्द निघतात.
१४६
आश्चर्यकारक अद्भुत पद, अक्रम ज्ञानींचे
हे सर्व ‘सायन्स' आहे. हा 'धर्म' नाही. धर्म तर, जे बाहेर चालत आहेत त्या सर्वांना ‘धर्म' म्हटले जाते. ते रिलेटिव्ह धर्म आहेत. रिलेटिव्ह म्हणजे नाशवंत धर्म आणि हे तर 'रियल', लगेच मोक्षफळ देणारे. लगेचच मोक्षाचा स्वाद चाखवणारे आहे.
असा मोक्षमार्ग चाखला आहे, त्याचा स्वाद घेतला आहे, अनुभवात सुध्दा आला आहे. ‘संपूर्ण जग निर्दोष आहे' असे तुमच्या 'समज' मध्ये आले आहे, आणि महावीर भगवंताच्या तर ते अनुभवात होते. एखाद्या वेळी तुम्हाला काही समजत नसेल आणि काही भानगड झाली, तरी पण लगेच हे ज्ञान हजर होऊन जाते की, यात त्याचा काय दोष? हे तर 'व्यवस्थित' आहे, असे तुम्हाला समजते. निमित्त आहे असेही समजते. सर्व काही समजते.
भगवंताला हे अनुभवात होते. आणि आमच्या समजमध्ये_आहे. समज आमच्यासारखीच असते ना ! एक्जेक्ट हजर, शूट ऑन साईट समज असते, म्हणून हे आमचे 'केवळ दर्शन' म्हटले जाते. तुमचे 'केवळ दर्शन' अजून होत आहे. ‘केवळज्ञान' होऊ शकेल असे तर शक्य नाही, मग आपण त्यास कशासाठी बोलवायचे ? जे होणे शक्य नसेल त्यास जर म्हटले, की 'या, या' तर काय होईल ? 'केवळ दर्शन' हे काय छोटे पद आहे? वर्ल्डचे ‘अद्भुत' पद आहे !!! या दुषमकाळात 'केवळ दर्शन' तर आश्चर्यकारक पद आहे. सुषमकाळात तीर्थकरांच्या वेळी असलेल्या पदापेक्षाही हे पद 'उच्च' म्हटले जाते. कारण आता तर तीन टक्के (गुण) असताना पास केले होते. महावीर भगवंताच्यावेळी तेहतीस टक्के (गुण) असल्यावर पास केले जात होते.
'संपूर्ण जग निर्दोष आहे' असे समजले ना !