________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
दिसल्याशिवाय गेले तर ते अक्रम विज्ञानच नाही. असे हे विज्ञान आहे. विज्ञानच आहे हे!
१०७
दोष प्रतिक्रमणाने धुतले जातात. कुणाच्या संघर्षात आले की मग दोष दिसू लागतात, आणि संघर्षात येत नाही तेव्हा दोष झाकलेला राहतो. रोजचे पाचशे-पाचशे दोष दिसू लागले तर समजावे की पुर्णाहूती जवळ येत आहे.
प्रश्नकर्ता : पण दादा, हे ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला अशी जागृती येते की स्वतःचे दोष दिसतात, खूप सारे पापही दिसतात आणि त्यामुळे मग भीती वाटते.
दादाश्री : त्याची भीती बाळगल्याने काय फायदा ? पाहणारा, होळी पाहणारा खरोखर जळतो का कधी ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : होळी जळते पण होळी पाहणारा जळतो का ? आणि हे तर चंदुभाऊला होते, तेव्हा चदुंभाऊची पाठ थोपटावी की भाऊ, असे होणार. केले आहे तर होणारच, असे म्हणावे.
प्रश्नकर्ता : पण लांबून सुद्धा चटका बसतोच ना, दादा !
दादाश्री : हो, चकटा बसतो.
प्रश्नकर्ता : इतकी सारी पापं केली आहेत दादा की असे वाटते केव्हा सुटका होईल!
दादाश्री : हो, ते तर अगणित, अपार दोष केलेले आहेत !
प्रश्नकर्ता : आणि ते जेव्हा दिसतात तेव्हा असे वाटते की, जर दादाजी भेटले नसते तर आमचे काय झाले असते !
दादाश्री : स्वत:ची पापं दिसू लागतात तेव्हापासूनच हे समजून