________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
म्हणून इथे लगेचच धुऊन टाकावे. वाईट विचार आले की लगेचच धुऊन टाकावे. कोणी चांगले केले की वाईट केले, ते पाहण्याची आपल्याला गरज नाही.
हे धर्मस्थान म्हटले जाते. घरी चूक केली असेल तर ती इथे सत्संगात धुतली जाते पण धर्मस्थानात चूक झाली तर ती चूक निकाचीत होते.
प्रश्नकर्ता : दादांजवळ बसलेले असू तरीही निकाचीत होते?
दादाश्री : नाही होत. पण त्याचा जसा लाभ मिळायला हवा तसा मिळत नाही. तर अशा चुका होत असतात. म्हणून तुम्हाला सावध करतो. चूक झाली म्हणून काही ज्ञान निघून जात नाही. सावध केल्यामुळे शुद्ध होते ना?
पाहतो दोष ज्ञानींचे, त्याला... तुला आमचा दोष दिसतो का कधी? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : कधीच नाही? आणि या बिचाऱ्याला पहिल्यांदाच आमचा दोष दिसत आहे. म्हणून आम्ही अनोळखी माणसांना आमच्या संर्पकात जास्त ठेवत नाही, बुद्धी वापरली की दोषच दिसतात माणसाला, मग खाली घसरतो. समज नसलेला तर नर्कात जातो. अरे, ज्ञानी पुरुषाचा, जे साऱ्या संसाराला तारतात, त्यांच्यातही दोष शोधून काढलास! पण हा अनोळखी माणूस, त्याला समज नाही. म्हणून आम्ही जास्त टचमध्ये ठेवत नाही. एक-दोन तासच ठेवतो. फक्त एक नीरुबेन, यांना कधीही दोष दिसले नाहीत, कित्येक वर्षांपासून सोबतच राहतात पण त्यांना एक सुद्धा दोष दिसला नाही! एक क्षणही आमचा दोष दिसला नाही, ते ह्या नीरुबेनला! हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना! तुला तर कधीतरी दिसत असेल, नाही? कधीच नाही?
प्रश्नकर्ता : दादाजी, आपले तर हे विज्ञान आहे, या गोष्टींची तर