________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दिसतो म्हणून आपण त्याला बैल आहे असे म्हणतो. पण तिथे जवळ जाऊन बघितले तर समजते की तो तर घोडा आहे. तेव्हा आपल्याला हे नाही का कळत की, आपले डोळे कमजोर झाले आहेत! म्हणून दुसऱ्यांदा आपण जे पाहतो ते नक्की तेच आहे असे मानू नये.
प्रश्नकर्ता : दादाजी आपल्या व्हिजन (दृष्टी) ने कुणाचाही दोष नाही, तरी पण मला असे का दिसते?
दादाश्री : तुला जे दिसते त्यात तू ज्ञानाचा उपयोग करत नाही ना! अज्ञानच चालू ठेवतोस. या दादांचा चश्मा घातला तर दोष दिसणार नाही. पण तू नेहमी त्या (अज्ञानाच्या) चश्मानेच पाहत असतो. नाही तर या जगात खरोखर कोणीच दोषी नाही. हा माझा अति सूक्ष्म शोध आहे.
वळवावे, दोष पाहणाऱ्या शक्तीला कुणाचाही दोष पाहू नये. मग तेव्हापासूनच समंजस होत जातो. वास्तवीक कुणाचाही दोष नाही. हा तर बिनकामाचा मॅजिस्ट्रेट बनतो. स्वत:चे दोष पूर्णपणे दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचे दोष पाहण्यास तयार झाला. दोष पाहण्याची शक्ती माणसात आहे, पण ती स्वतःचा दोष पाहण्यासाठी आहे, दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी नाही. त्याचा दुरुपयोग झाल्यामुळे स्वत:चे दोष पाहण्याची शक्ती बंदच झाली आहे. दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी ही शक्ती नाही. तो स्वत:चा दोष बघतच नाही ना? आपण दुसऱ्यांचे दोष बघतो पण ते त्यांना आवडते का?
प्रश्नकर्ता : नाही आवडत. दादाश्री : मग न आवडणारा व्यापार आपण बंद करायला नको का? 'व्यवस्थित शक्ती' कर्ता, तिथे चूक कोणाची?
जागृती ठेवायचीच आहे असा आपला निश्चय असला पाहिजे. चुकांचा प्रश्न नाही. आपल्या इथे चूक होतच नसते. चूक तर 'ज्याची'