________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
की मला तुझे काम नाही आणि परत त्याच्याचकडून आपण काम करवून घेत राहीलो तर चालेल का? त्याचप्रमाणे बुद्धीचा एकदाही वापर करु नये! बुद्धीला अजिबात सहकार्य देऊ नये. विपरीत बुद्धी संसारातील हिताहितचे भान दाखविणारी आहे. जेव्हा सम्यक् बुद्धी ही संसाराला बाजूला सारुन मोक्षाला घेऊन जाणारी आहे.
प्रश्नकर्ता : दोष सुटत नाहीत तर काय करावे?
दादाश्री : दोष सुटत नाहीत पण त्या दोषांना 'आपली वस्तू नाही' असे म्हटले तर सुटतात.
प्रश्नकर्ता : पण असे म्हटल्यावरही सुटत नसतील तर काय करावे?
दादाश्री : जे दोष बर्फासारखे गोठलेले आहेत ते एकदम कसे सुटतील? पण तरीही ते ज्ञेय आणि आपण ज्ञाता असा संबंध ठेवला तर त्यामुळे ते दोष सुटतील. त्यास आपला आधार असता कामा नये. आधार नसल्यावर दोष निघूनच जातील. आधारामुळेच वस्तू टिकून राहते. निराधार झाली की ती पडते. हे जग आधाराने टिकून राहिले आहे. निराधार झाले म्हणजे टिकू शकणारच नाही, पण निराधार करणे जमत नाही ना! तो तर फक्त ज्ञानींचाच खेळ! हे जग अनंत 'गुह्य' आहे, यात 'गुह्यात गुह्य' भागाला कसे समजू शकणार?
दोष असतात थरवाले त्या चुका मग ज्ञेय स्वरुपात दिसतात. जितके ज्ञेय दिसतील तेवढ्यांपासून मुक्त होत जातो. जसे कांद्याला पाकळ्या असतात तसे दोष पण पाकळीवाले असतात. जसजसे दोष दिसू लागतात तसतसे त्यांच्या पाकळ्या (थर) निघू लागतात. आणि जेव्हा सर्व थर निघून जातात तेव्हा ते दोष मुळासकट कायमसाठी निरोप घेतात. कित्येक दोषांचा एकच थर असते. त्यांना दुसरा थर नसतो. म्हणून त्या दोषांना एकदाच पाहिल्याने निघून जातात. जास्त थर असलेल्या दोषांना पुन्हा-पुन्हा पाहावे लागते,