________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
असायचा, चादर ओढून. ताप होता, मलेरियाच्या तापाने पीडीत, भाद्रपद महिन्यात मच्छर खूप असायचे, म्हणून मलेरिया खूप पसरत होता, म्हणजे मलेरिया हा पित्ताचा ज्वर म्हटला जातो. तो वायू अथवा कफाचा ज्वर नाही. पित्ताचा ज्वर, तर इतके अधिक पित्त वाढत होते. पावसाचे दिवस आणि पित्तज्वर आणि त्यावर मच्छर चावतात. ज्याला जास्त पित्त असते त्याला चावतात. म्हणून माणसांनी, या शोधकर्त्यांनी हे शोधले होते की, या हिंदूस्तानात काहीतरी मार्ग शोधून काढा. नाहीतर जनसंख्या अर्धी होऊन जाईल. आता तर मच्छर कमी झाले आहेत, नाहीतर मनुष्य जिवंत राहिला नसता. म्हणजे या पित्ताच्या तापाचे शमन करण्यासाठी, अशी शमन क्रिया करण्यासाठी शोध लावला होता की हे लोक दूधपाक, खीर, दुध आणि साखर इत्यादी खातील तर पित्त शमेल आणि मलेरियापासून सुटका मिळेल. आता ही लोकं घरचे दुध असले तरीही खीर-बीर बनवत नव्हते. खीर खात नव्हते, अशी ही लोकं होती! खूप नॉर्मल ना (!) मग काय होणार ते आपण जाणता? आता दुधपाक, खीर रोज खाणार तरी कशा प्रकारे?
आता वडिलांना तर एक अक्षर सुद्धा पोहोचत नाही. पण या लोकांनीच शोधून काढले होते की, हिंदुस्तानातील लोक चार आण्याचाही धर्म करतील, असे नाहीत. इतके लोभी आहेत की दोन आणेही धर्म करणार नाहीत. म्हणून असे उल्टे कान पकडायला लावले की, 'निदान तुझ्या बापाचे श्राद्ध तरी कर!' असे सगळे बोलायला येतात. अशा प्रकारे श्राद्धाचे नाव पाडले. म्हणून लोकांनी नंतर सुरु केले की बापाचे श्राद्ध तर करावेच लागेल ना! आणि माझ्यासारखा कोणी अडून बसणारा असेल आणि तो जर श्राद्ध करत नसेल तर काय म्हणतात? 'बापाचे श्राद्धही करत नाही.' आजूबाजूचे सर्व किचकिच करतात, म्हणून मग तो श्राद्ध करतो, आणि लोकांना खाऊ घालतो.
तेव्हा पौर्णिमेपासून खीर खायला मिळते आणि ते पंधरा दिवस खीर मिळतच राहते. कारण की आज माझ्याकडे, उद्या तुझ्याकडे आणि लोकांनाही हे जमले की, 'असो, पाळी पाळीनेच खायचे आहे ना! लुबाडले