________________
८४
प्रश्नकर्ता : ते तर काही संयोग होतात तेव्हा.
दादाश्री : हो, संयोगामुळे.
प्रश्नकर्ता : आणि इच्छा असतील तर?
प्रतिक्रमण
दादाश्री : इच्छा होणे म्हणजे स्थूळवृत्ति होणे. पूर्वी आपण जो भाव केलेला असेल तो भाव पुन्हा उभा झाला आहे आता, तर तेथे प्रत्याख्यान करायचे.
प्रश्नकर्ता : त्यावेळी 'दादाजीं'नी सांगितले आहे की, ही वस्तु आता नको व्हायला पाहिजे. असे प्रत्येक वेळेला म्हणायचे.
दादाश्री : ही वस्तु माझी नाही आहे, ती ओसरवित (सर्मपित करत) आहे. अज्ञानतामध्ये ह्या सर्वांना बोलविल्या होत्या. पण आज त्या माझ्या नाही आहेत. म्हणून ओसरवित आहे. मन-वचन-कायाने ओसरवित आहे. आता मला काही ही नको. हे सुख मी अज्ञानतामध्ये बोलविले होते, पण आज हे सुख माझे नाही आहे. म्हणून ओसरवित आहे.
ह्या अक्रमविज्ञानचा हेतूच सगळा शूट ऑन साईट प्रतिक्रमणचा आहे. त्याच्या बेसमेन्ट (पाया) वरच उभा राहिला आहे. चुक कोणाची होतच नाही. आपल्या निमित्ते समोरच्याचे जे काही नुकसान झाले, तर द्रव्यकर्मभावकर्म-नोकर्मपासून मुक्त असा त्याच्या शुद्धात्माला आठवून प्रतिक्रमण करायचे.
प्रश्नकर्ता : परंतु प्रत्येक वेळेला एवढे पूर्ण लांब बोलायचे?
दादाश्री : नाही, तसे काही नाही. शार्टमध्ये ( संक्षिप्तमध्ये) आटोपून घ्यायचे. समोरच्याचा शुद्धात्माला हजर करून (आठवून) त्याला फोन करायचा की, 'ही चुक झाली माफ करा'.
आणि दुसरे आपल्या घरातील माणसांचे पण रोज प्रतिक्रमण करायला हवे. तुमचे आई-वडील, भाऊ, बहिणी सर्वांचे, रोजच प्रतिक्रमण करायला हवे. कुटुंबातील सर्वांचे, कारण की, त्यांच्या बरोबर चिकट फाईल असणार.