________________
५२
प्रतिक्रमण
काळ विचित्र आहे हा. पण तुम्ही जर पुसून टाकले तर तुम्हाला असे फळ मिळणार.
प्रश्नकर्ता : साधारणतः एक तासात पांच-पंचवीस अतिक्रमण होऊन
जातात.
दादाश्री : ते एकत्र करून करायचे. एकत्र करु शकतात. हे एकत्र प्रतिक्रमण करत आहे असे म्हणायचे.
प्रश्नकर्ता : तर हे कशाप्रकारे करायचे? काय म्हणायचे?
दादाश्री : हे सर्व खूपच अतिक्रमण झाले आहेत म्हणून ह्या सर्वांचे एकत्र प्रतिक्रमण करत आहे. विषय बोलायचे की ह्या ह्या विषयवर हे हे दोष झाले त्याचे सामुहिक प्रतिक्रमण करत आहे असे म्हटले म्हणजे निकाल होऊन गेला, आणि तरीसुद्धा बाकी राहिले तर ते धुवून टाकता येईल. नंतर धुतले जाईल. पण त्याच्यावर बसून नाही रहायचे. बसून राहिलात तर सर्व चे सर्वच (प्रतिक्रमण) राहून जातील. गोंधळात पडण्याची गरज नाही.
१४. ... काढते कषायच्या कोठडीमधून प्रश्नकर्ता : कोणावर रागाने खूप ओरडलो, बोलून मग गप्प झालो पण, नंतर हे जे बोललो त्यामुळे जास्त तळमळ झाला तर त्यात एकापेक्षा जास्त प्रतिक्रमण करावे लागते?
दादाश्री : हे दोन-तीन वेळा चांगले हृदयापासून केले आणि एकदम योग्य पद्धतिने करून घेतले म्हणजे समाप्त झाले. 'हे दादा भगवान! भयंकर भानगड आली. त्याने जबरदस्त चिडलो. समोरच्याला खूप दुःख झाले! त्याची मी माफी मागतो, आपल्या साक्षीत, खूप जबरदस्त माफी मागतो.'
प्रश्नकर्ता : कोणा बरोबर जास्तवेळा वादावाद झालेला असेल त्यामुळे मनात जास्त अंतर वाढत जाते. आणि कोणा बरोबर एक-दोनवेळा झाले असेल, तर अमुकमध्ये प्रतिक्रमण दोन-तीन-चारवेळा, अशी जास्तवेळा करीत रहावे लागते की एक वेळा केले तर सर्वाचे येवून जातात?
दादाश्री : जेवढे होत असेल तेवढे करायचे. आणि शेवटी मग