________________
प्रतिक्रमण
स्वत:साठी उलटे विचार करायचे, उलटे करायचे, स्वत:ची गाडी चालणार की नाही चालणार. आजारी पडलो आणि मरून गेलो तर काय होईल? हे आर्तध्यान म्हणावे.
रौद्रध्यान तर आपण दुसऱ्यांवर कल्पना करतो की ह्याने माझे नुकसान केले. हे सर्व रौद्रध्यान म्हणायचे.
आणि दुसऱ्यांच्या निमित्ताने विचार करतो, दुसऱ्यांचे काही ना काही नुकसान व्हावे असा विचार आला, तर ते रौद्रध्यान झाले म्हणायचे. मनात विचार आला की, कापड ताणून द्यायचे. ते ताणून द्यायचे म्हटले, तेव्हापासूनच ग्राहकांच्या हातात कापड कमी जाणार. आणि त्यांच्याकडून जास्त पैसे काढून घेणार अशी कल्पना केली हे रौद्रध्यान म्हणायचे. दुसऱ्यांचे नुकसान करायचे ध्यान रौद्रध्यान म्हणायचे.
जबरदस्त रौद्रध्यान केले असेल, पण प्रतिक्रमणाने ते आर्तध्यान होऊन जाते. दोन जणांनी रौद्रध्यान एकच प्रकारचे केले. दोघांनी म्हटले की अमक्याला मी मारून टाकणार. असा दोन दोघांनी मारण्याचा भाव व्यक्त केला. ते रौद्रध्यान म्हणायचे. पण एकाने घरी गेल्यावर पस्तावा केला की 'जळो, ते मी असा भाव का केला.' त्यामुळे ते आर्तध्यान होऊन गेले आणि दुसऱ्यांचे रौद्रध्यान राहिले.
अर्थात् पस्तावा केल्याने रौद्रध्यान पण आर्तध्यान होऊन जातो. पस्तावा केल्याने नरकगति अटकन तिर्यंचगति होत असते. आणि जास्त पस्तावा केले तर धर्मध्यान बांधते. एकवेळा पस्तावा केला तर आर्तध्यान होते आणि पुन्हा पुन्हा पस्तावा करतच राहिलात, तर धर्मध्यान होऊन जाते. अर्थात् क्रिया ती च्या ती च, पण (ध्यान) फेरफार होत असतो.
प्रश्नकर्ता : 'आम्ही' स्वतः वेगळे राहून प्रतिक्रमण करवून घेतले तर त्याला काय म्हणायचे?
दादाश्री : असे आहे की, आम्ही शुद्धात्मा झालोत, पण ह्या पुद्गल ची सुटका व्हायला पाहिजे ना? म्हणून जोपर्यंत त्याच्या कडून प्रतिक्रमण करवून घेणार नाही तोपर्यंत सुटका नाही होणार, जोपर्यंत पुद्गलला