________________
४८
प्रतिक्रमण
आम्हाला वेदनीय स्पर्शत नाही, तीर्थंकरांना पण स्पर्शत नाही. आम्हाला हीराबाच्या जाण्याचा खेद नाही. आम्हाला असर पण नाही काही, लोकांना असे वाटते की, आम्हाला वेदनीय आले, अशाता वेदनीय आले. पण आम्हाला एक मिनिट, एक सेकंद पण अशाता स्पर्शत नाही, या वीसवर्षात ! आणि ते च विज्ञान मी तुम्हाला दिले आहे पण तुम्ही कच्चे पडलात तर तुमचे गेले. समजल्यामुळे कच्चे पडणारच नाही ना, कधी पण?!
प्रश्नकर्ता : अंबालालभाईला तर स्पर्शते ना? 'दादा भगवान'ला तर वेदनीय-कर्म नाही स्पर्शत.
दादाश्री : नाही, कोणलाही स्पर्शणार नाही, असे हे विज्ञान आहे. स्पर्शत असेल तर वेडाच होवून जाईल ना? हे तर नाही समजल्यामुळे दु:ख आहे. समज असेल तर या फाईलला नाही स्पर्शणार. कोणालाही स्पर्शणार नाही. जे दुःख आहे ते अज्ञानतेचे आहे. या ज्ञानला जो समजून घेईल ना, तर दुःख होणार च कसे? अशाता पण नाही होणार आणि शातापण नाही होणार.
१३. विमुक्ति, आर्त-रौद्रध्यानने प्रश्नकर्ता : सांगतात की आर्तध्यान आणि रौद्रध्यान क्षणोक्षणी होतच असतात. तर आर्तध्यान कोणाला म्हणतात आणि रौद्रध्यान कोणाला म्हणतात त्याचे जरा स्पष्टीकरण करून द्या.
दादाश्री : आर्तध्यान आहे ते स्वत:चे स्वत:लाच.कोणालापण मध्ये आणत नाही. कोणाला गोळी लागणार नाही. अशा प्रकारे सांभाळून स्वतः आपले दुःख झेलत रहातो हे आर्तध्यान आणि दुसऱ्यावर गोळी सोडून देतो ते रौद्रध्यान.
आर्तध्यान तर स्वत:ला ज्ञान नसेल आणि 'मी चंदुलाल आहे' असा होवून जातो आणि मला असे होईल किंवा असे झाले तर काय होणार? मुलींची लग्न करून देणारा तू आहेस? मुलगी चोवीस वर्षाची होईल तेव्हा तिचे लग्न होणार. पण हा तर ती पांच वर्षाची आहे तेव्हापासून चिंता करत असतो, हे आर्तध्यान केले म्हणायचे, समजले का?