________________
प्रतिक्रमण
(वैरभाव) राहात नाही. नाहीतर आपण पुन्हा त्याला भेटलो तर त्याच्याशी भेद पडत जातो.
२७
प्रश्नकर्ता : आमच्या पापकर्मांना आता कशाप्रकारे धुवायचे ?
दादाश्री : पाप कर्मांचे जेवढे डाग लागलेले असतील तेवढे प्रतिक्रमण करायचे. जर डाग चिकट असेल तर त्याला पुन्हा पुन्हा धुवायचे, सारखे धूवतच रहायचे.
प्रश्नकर्ता : तो डाग निघाला की नाही निघाला, हे कशाप्रकारे माहित
पडेल?
दादाश्री : हे तर आत मन साफ होते त्याच्याने माहित पडून जाते. चेहरा प्रसन्न होऊन जातो. तुम्हाला माहित पडणार की डाग निघून गेला ? का माहित नाही होणार? हरकत काय आहे? आणि नाही धुतले गेले तरी आपल्याला हरकत नाही. तु प्रतिक्रमण कर ना ! तु साबण टाकत च जा ना! पापाला तु ओळखतो? खरोखर पापाला तु ओळखत आहे का ?
प्रश्नकर्ता : दादांची आज्ञा नाही पाळली म्हणजे पाप ?
दादाश्री : नाही, असे नाही, त्याला पाप नाही म्हणत. समोरच्याला दुःख झाले ते पाप; कोणत्याही जीवास, तो मग मनुष्य असो की जनांवर असो की झाड असो. झाडाची पण विनाकारण पाने तोड-तोड केली तर त्याला पण दुःख होते, म्हणून त्याला पाप म्हणतात.
आणि आज्ञा पालन नाही झाले तर तुमचेच नुकसान होणार. तुमचे स्वत:चेच नुकसान होणार. पापकर्म, तर कोणाला दुःख दिले ते, अर्थात् जरा सुद्धा, किंचित्मात्र पण दुःख नाही व्हावे असे व्हायला पाहिजे.
आपण प्रतिक्रमण केले तर खूपच चांगले. आपले कपडे (दोषरूपी डाग) स्वच्छ होणार ना? आपल्या कपड्यात मळ कशासाठी राहू द्यायचा? दादाने असा मार्ग दाखवला आहे, तर का नाही स्वच्छ करून टाकावे ? !
कोणाला आपल्याकडून किंचित्मात्र पण दुःख झाले तर समजायचे ती चुक आपलीच आहे. आपल्या आत काही वर-खाली परिणाम झाला