________________
प्रतिक्रमण
आपलाच हिशोब आहे. हा तर निमित्तालाच चावा घेत असतो आणि याचेच झगडे आहेत हे सर्व.
उलटे चालला त्याचे नांव अतिक्रमण, परत फिरला त्याचे नांव प्रतिक्रमण.
जेथे झगडा आहे तेथे प्रतिक्रमण नाही आणि जेथे प्रतिक्रमण आहे तेथे झगडा नाही. ____ मुलांना मारण्याचा काहीच अधिकार नाही. समजावण्याचा अधिकार आहे. तरी सुद्धा मुलांना मारले गेले आणि त्याचे प्रतिक्रमण नाही केले तर सर्व कर्म चिकटतच जातील ना? प्रतिक्रमण तर व्हायला पाहिजे ना!
'मी चंदुभाई (वांचकांनी स्वत:चे नाम समजावे) आहे' हेच अतिक्रमण. तरीसुद्धा व्यवहारात हे लेट गो करूया (चालवून घेऊ). पण कोणास दु:ख होते तुमच्याकडून? होत नसेल तर ते अतिक्रमण नाही. पूर्ण दिवसात कोणाला स्वत:कडून दुःख झाले हे अतिक्रमण झाले, त्याचे प्रतिक्रमण करा. हे *वीतरागांचे सायन्स आहे. अतिक्रमण अधोगतित घेवून जाणार आणि प्रतिक्रमण ऊर्ध्वगतित घेवून जाणार. ते ठेठ मोक्षपर्यंत प्रतिक्रमणच हेल्प करणार.
प्रतिक्रमण कोणाला करायचे नसतात? ज्याने अतिक्रमण केले नसेल
त्याने.
प्रश्नकर्ता : व्यवहार, व्यापार आणि अन्य प्रवृत्तित अन्याय होत आहे असे वाटते, त्याकारणे मनास ग्लानि होते, आणि त्यामुळे व्यवहाराला नुकसान होत असेल तेव्हा काय करायचे? आमच्याकडून जर असा अन्याय होत असेल तर त्याचे प्रायश्चित काय?
दादाश्री : प्रायश्चितात आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान व्हायला पाहिजे. जेथे जेथे कोणावर अन्याय होत असेल तेथे आलोचना, प्रतिक्रमण व्हायला पाहिजे आणि पुन्हा अन्याय नाही करणार असे नक्की करायला हवे. ज्या भगवानला मानत असाल, कोणत्या भगवानला मानतात? *वीतराग = संपूर्ण राग-द्वेष रहित झालेले आहेत ते.