________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : आणि जेव्हा आपल्याला वाटते की 'हा तर नक्कीच फुटणार, तेव्हा फूस होऊन जातो! फुर्रर... फूस होतो. नाही होत असे?'
आणि मन ओरडतो की 'किती जास्त बोललात, अती झाले हे.' तेव्हा मनाला सांगावे, ‘झोप ना आता, हे घाव तर लगेच भरले जातील.' त्वरीत भरलेही जातात..... हो की नाही, खांद्याला थोपटवा म्हणजे झोपेल. तुझे घाव भरले गेले ना सर्व! नाही? जे घाव पडले होते ते?
प्रश्नकर्ता : भांडण होते तेव्हाही भरलेला मालच निघत असतो?
दादाश्री : तसे तर भांडण होते तेव्हा आत नवीन माल भरला जात असतो. पण हे आपले ज्ञान घेतल्यानंतर भरलेला माल खाली होतो.
प्रश्नकर्ता : नवरा जर माझ्याशी भांडत असेल आणि त्यावेळी मी प्रतिक्रमण केले तर?
दादाश्री : काही हरकत नाही. प्रश्नकर्ता : तर तेव्हा सारा भरलेला माल खाली होऊन जाईल ना?
दादाश्री : तेव्हा तर सर्व निघून जाईल. जर प्रतीक्रमण होत असेल तर सर्व माल खाली होत जातो. प्रतीक्रमण हा एकच उपाय आहे या जगात.
पतीने ओरडले तर आता तू काय करशील? प्रश्नकर्ता : समभावाने निकाल करायचा. दादाश्री : असे होय! निघून तर जाणार नाही आता? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : आणि जर तो निघून गेला, तर मग तू काय करशील? 'माझे तुझ्याबरोबर जमणार नाही' असे तो बोलला तर?
प्रश्नकर्ता : परत बोलावून आणेल. माफी मागून, पाया पडून परत बोलावून आणेन.
दादाश्री : हो परत बोलावून आणायचे. समजावून-उमजावून