________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
६७
अर्थात् पूजा करु नका. तशी योग्यता नाही. म्हणून मनाने पूजा करा.
तुम्ही पत्नीला सांगा की 'तुला माझ्याबरोबर जितके भांडायचे आहे तितके भांड. मला तर दादांनी भांडायचे नाही असे सांगितले आहे. दादांनी मला आज्ञा केली आहे. हा मी बसलो आहे, तुला जे काही बोलायचे आहे ते बोल आता, असे तिला सांगावे.'
प्रश्नकर्ता : पण मग ती बोलणारच नाही ना.
दादाश्री : दादांचे नांव येताच चूप होऊन जाईल. दुसरे कुठले हत्यार वापरु नकोस. हेच हत्यार वापर.
___ एक ताई तर मला म्हणाल्या होत्या, लग्न झाले तेव्हा हे खूप कडक होते.' मी विचारले, 'आता?!' तेव्हा म्हणाली, 'दादा, तुम्ही तर सर्व स्त्री चारित्र्य ओळखता, माझ्या कडून का बोलवून घेता!' त्यांना माझ्याकडून काही सुख हवे असेल, तेव्हा मी त्यांना सांगते की, 'बाईसाब बोला.' बाईसाब म्हणवून घेत होती. त्यात माझी काय चुक? आधी ते माझ्याकडून भाईसाब म्हणवून घेत होते तर आता मी त्यांच्याकडून बाईसाब म्हणवून घेते. समजले?
__ हे अमलदार ही ऑफिसातून त्रासून घरी आले ना, तेव्हा बाई साहेब काय म्हणतात की 'दिढ तास उशीर झाला? कुठे गेलेलात?' घ्या!! एकदा त्याची बायको त्याला खडसावत होती, असा सिंहासारखा माणूस, ज्याला सर्व गुजरात घाबरतो त्याला ही घाबरवत होती, पहा ना! पूर्ण गुजरातमध्ये ज्याला कोणी एक शब्दही बोलू शकत नाही त्याला त्याची बायको ऐकतच नव्हती, उलट त्याला खडसावत होती! मग एके दिवशी मी, तिला म्हणालो, 'ताई' तुझा पती आहे तो जर तुला एकटीला सोडून दहा-पंधरा दिवस बाहेरगावी गेला तर? तेव्हा म्हणाली, 'मला तर भीती वाटेल.' कशाची भीती वाटते? तेव्हा म्हणू लागली, 'आत दुसऱ्या खोलीत पेल्यांचा जरी खडखडाट झाला तरीही मला वाटते की भूत आले असेल!' एखाद्या उंदराने देखील प्याला खडखडावला तरी मला भीती वाटते. आणि असा हा धनी! ज्या धनीमुळे तुला भीती नाही वाटत, त्याच धनीला तू खडसावत राहते. वाघासारख्या धनीचे तेल काढतेस!