________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
५३
प्रश्नकर्ता : प्रेम आणि आसक्ति यातील फरक जरा समजवा.
दादाश्री : जे विकृत प्रेम आहे, त्याचेच नांव आसक्ति. या जगात आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते विकृत प्रेम म्हटले जाते आणि यालाच आसक्ति म्हणतात. ___ हे तर सुई आणि चुंबकामध्ये जशी आसक्ति असते, तशी ही आसक्ति आहे. ह्यात प्रेमासारखी वस्तूच नाही. प्रेम नाहीच कुठेही. हे तर सुई आणि चुंबकाच्या आकर्षणामुळे तुम्हाला असे वाटते की, मला प्रेम आहे आणि त्यामुळे मी ओढलो जात आहे. पण ही प्रेमासारखी वस्तूच नाही. प्रेम तर, ज्ञानी पुरुषाचे 'प्रेम' हेच प्रेम म्हटले जाते.
या दुनियेत शुद्ध प्रेम हाच परमात्मा आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी परमात्मा ह्या दुनियेत झालाच नाही, आणि होणारही नाही, आणि तिथेच दिल (हृदय) प्रसन्न होते आणि तेव्हा दिलावरी काम होते. नाहीतर दिलावरी काम होऊ शकत नाही. दोन प्रकारेने हृदय प्रसन्न होते. अधोगतीत जायचे असेल तर एखाद्या स्त्रीवर हृदय ओवाळून टाकावे, आणि ऊर्ध्वगतीत जायचे असेल तर ज्ञानीवर हृदय ओवाळून टाकावे आणि हे ज्ञानी पुरुष तर तुम्हाला मोक्षाला घेऊन जातील. दोन्हीही जागी दिलचीच (हृदयाची) जरुरत पडेल, तेव्हाच दिलावरी प्राप्त होते.
अर्थात् ज्या प्रेमात क्रोध-मान-माया-लोभ काहीही नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, जे प्रेम समान, एकसारखेच रहाते असे शुद्ध प्रेम पाहिल्यावर, माणसाचे हृदय प्रसन्नतेने भरुन येते.
मी प्रेम स्वरुप झालो आहे. ह्या प्रेमातच तुम्ही मग्न व्हाल तेव्हा जग विसरुनच जाल. जग पूर्ण विस्मृत होईल. प्रेमात मग्न झाल्यावर तुमचा संसार उत्तम प्रकारे चालेल. आदर्शमय चालेल.
१६. लग्न केले म्हणजे 'प्रोमिस टू पे' हीराबांचा एक डोळा १९४३ मध्ये गेला. त्यांना झामरचा त्रास होता, त्यावर उपचार करताना डॉक्टरांनी जरा असे काही केले की त्याचा दुष्परिणाम डोळ्यांवर झाला आणि त्यामुळे नुकसान झाले.