________________
४२
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
११. संशय जाळेल सोन्याची लंका आजकाल घरात भांडण जास्त करुन संशयामुळे होत असतात. त्याचे असे आहे की, संशयामुळे स्पंदन उडतात आणि त्यामुळे भडका उडतो. आणि जर निसंशय झालो तर भडका आपोआपच शांत होऊन जाईल. पतिपत्नी दोघेही संशयी असतील तर भडका कसा शांत होणार ? दोघांपैकी एकाला तर निसंशय व्हायलाच हवे, तेव्हाच सुटका होऊ शकते. आईवडिलांच्या भांडणामुळे मुलांवरील संस्कार बिगडतात. मुलांचे संस्कार बिघडू नये यासाठी दोघांनी समंजसपणे निकाल आणला पाहिजे. हा संशय काढणार कोण? आपले हे 'ज्ञान' तर संपूर्ण निसंशय बनवेल असे आहे !
एका पतीला आपल्या पत्नी वर शंका झाली. तर हे बंद होईल? नाही. ही तर आयुष्यभराची शंका म्हटली जाते. काम झाले ना, पुण्यशाली(!) पुण्यशाली माणसांनाच होते ना ! अश्याचप्रकारे पत्नीला पण पतीवर शंका झाली, तर ती ही आयुष्यभर जात नाही.
प्रश्नकर्ता : शंका करायची नसते तरीही होऊन जाते त्याचे काय ?
दादाश्री : आपलेपणा, मालकीपणा (स्वामित्व). माझा पती आहे ! पती भले असेल, पती असण्यात हरकत नाही. 'माझा' बोलण्यातही हरकत नाही, ममता ठेवायची नाही. 'माझा पती' असे बोला, पण ममता ठेवू नका.
या जगात दोन गोष्टी ठेवा. वरवर विश्वास शोधा आणि वरवर संशय करा. खोलात जाऊ नका. आणि शेवटी, विश्वास शोधणारा 'मेड' होऊन जातो. मेन्टल हॉस्पिटलमध्ये लोकं पाठवून देतील. हे पत्नीला एखाद्या दिवशी बोलतात, 'तू शुद्ध आहेस ह्याची खात्री काय?' तेव्हा वाईफ काय बोलेल, 'जंगली कुठला.'
ह्या मुली बाहेर शिकायला जातात, त्यांच्यावरही शंका! वाईफ वर सुद्धा संशय! असा सर्व विश्वासघात, दगाफटका ! आता घरातही विश्वासघातच आहे ना! ह्या कलियुगात स्वत:च्या घरातच विश्वासघात होतो. कलियुग म्हणजे विश्वासघाताचा काळ. कपट आणि विश्वासघात, कपट आणि विश्वासघात ! ह्यात कोणत्या सुखासाठी काय करत आहोत ? ह्याचेही भानच रहात नाही, बेभानपणे ! निर्मळ बुद्धिवाल्यांकडे कपट आणि