________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
३५
हा तर व्यर्थ वेडेपणा होता, मालकत्व सिद्ध करण्याचा. अर्थात् मालकत्व नाही दाखवले पाहिजे. मालक तर केव्हा म्हटले जाईल की, जेव्हा समोरचा प्रतिकार करत नसेल तर, तेव्हा समजा की मालक आहे. हे तर लेगेचच प्रतिकार करतात.
घरात तर स्त्री वर सर्वच किटकिट करतात, ही वीर पुरुषांची निशाणी नाही. वीर तर कोणाला म्हणतात की, जो घरात स्त्री अथवा मुलांना, कोणालाही त्रास देत नाही. मुलगा जरी उलटे बोलला, तरी पण आई-वडील मुलावर बिघडणार नाही, तेव्हा खरे बोलावे. मुलं तर शेवटी मुलंच आहेत तुम्हाला काय वाटते? न्याय काय सांगतो.
कोणत्या गोष्टीसाठी टोकावे लागते की, ज्याची तिला समज नसेल. त्यासाठी आपण तिला समजावले पाहिजे. तिला स्वत:ची समज आहे. तरीपण आपण तिला सांगितले, तेव्हा मग तिचा इगोइझम दुखावला जाईल. आणि मग ती सुद्धा संधी शोधते की, माझ्या तावडीत येऊ दे एक दिवस. संधीच्या शोधात राहते. तर मग असे करण्याची काय गरज आहे? अर्थात् ज्या-ज्या गोष्टी ती समजू शकेल अशा असतील त्यात तिला टोकण्याची गरज नाही आपल्याला.
जास्त कडू असेल तर आपण एकट्यानेच पिऊन घ्या, पण स्त्रियांना कसे प्यायला द्याल? कारण आफ्टर ऑल (शेवटी) आपण महादेवजी आहोत. आपण महादेवजी नाही आहोत? पुरुष महादेवजी समान असतात. अधिक कडू असेल तर तिला सांगा. तू झोपून जा, मी पिऊन घेईल! स्त्रिया सुद्धा संसारात सहकार्य नाही का देत? मग त्यांना का दुःखवायचे? तिला जर काही दुःख झाले असेल, तर आपण मनातल्या मनात पश्चाताप केले पाहिजे की आता दुःख नाही देणार, माझी चुक झाली ही.
घरात कुठल्या प्रकारचे दुःख असते? कश्यावरुन भांडण होत असतात? कुठल्या प्रकारचे मतभेद असतात? हे जर दोघांनी लिहन आणले ना, तर एका तासातच सर्वांचे निसरन करुन देऊ. हे सर्व समज नसल्यामुळेच होत असते, बाकी काही कारण नाही.
आपल्या घरातली गोष्ट घरातच राहिल अशाप्रकारे फॅमिलीसारखे