________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
तो मुलगा आला, पंचवीस वर्षाचा होता तो. तेव्हा मी सत्संगच्या, या दुनियाच्या सर्व गोष्टी केल्या. कारण की ही वैज्ञानिक पद्धत चांगली आहे, आपल्याला ऐकण्यासारखी आहे. आतापर्यंत जे चालत होते ते काळानुसार लिहिले गेले आहे. जसा काळ होता तसे वर्णन केलेले आहे. अर्थात् जग जस-जसे बदलत जाते, तसे वर्णन बदलत जाते. आणि पैगंबर साहेब म्हणजे काय? खुदाचे पैगाम इथे आणून सर्वांना पोहचवतो त्याचे नांव पैगंबर साहेब. मी तर थट्टा केली त्याची, मी विचारले की, 'अरे, लग्न-बिग्न केले की नाही, की असाच फिरतो आहेस?' तो म्हणाला 'लग्न केले आहे.' मी विचारले, 'केव्हा केले? मला बोलावले नाहीस तू?' तर तो म्हणाला 'दादाजी माझी आपल्याबरोबर ओळख नव्हती, त्यावेळी नाहीतर बोलावले असते, आता लग्न होऊन सहा महिनेच झाले आहेत.' मी थोडी गम्मत केली, मी विचारले 'नमाज किती वेळा पढतोस?' म्हणे 'साहेब, पाचही वेळा,' अरे, रात्री तीन वाजता नमाज कशी जमते? तेव्हा तो म्हणाला, 'करावीच लागते, त्यात चालतच नाही, रात्री तीन वाजता उठून अदा करतो. लहानपणापासूनच करत आलो आहे. माझे वडिल हकीम साहेब पण करत होते.' मग मी विचारले, 'आता तर बायको आली, आता कशी करु देणार, तीन वाजता?' 'बीबीने पण मला सांगितले आहे की, तुम्ही नमाज पढून घ्यावी.' तेव्हा मी विचारले, 'बायकोबरोबर भांडण होत नाही का?' 'हे काय बोलतात? हे काय बोलतात?' मी विचारले 'का?' तेव्हा तो म्हणाला 'ओहोहो, बायको तर तोंडाचे पान! ती मला ओरडली तरी मी चालवून घेईल, साहेब. बीबीमुळेच तर मी जगतो आहे, बीबी मला खूप सुख देते. खूप छान छान जेवण बनवून देते. तिला दुःख कसे द्यायचे?' आता इतके समजलात तरी खूप झाले. बायकोवर रुबाब तर करणार नाही. आपल्याला समजायला नको? बायकोचा काही अपराध आहे का? ती तर 'तोंडातले पान' तिने शिवी दिली तरी काही हरकत नाही. कोणी दुसऱ्याने शिवी दिली तर मी बघून घेईल. बघा आता! ह्या लोकांना बायकोची किती किंमत आहे.
६. समोरच्यांची चुक काढण्याची सवय! प्रश्नकर्ता : चुक काढली तर वाईट वाटते त्यांना आणि नाही काढली तरीपण वाईट वाटते.