________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
३१
झोपावे, ह्यात काय मजा येणार? रात्रभर झोप येणार नाही. पण आता तर मी कुठे जाऊ शेठजी?! म्हणून ह्या बायकोला मी कधीही दुःख नाही देत. बीबीने मला मारले तरीपण तिला दु:ख नाही देत. मी बाहेर सर्वांन बरोबर भांडण करुन येईल, पण 'बायकोबरोबर मी क्लियर राहतो. बायकोला काहीही नाही केले पाहिजे.' म्हणजे त्याला जर खाज येत असेल, तर तो बाहेर भांडण करुन येणार पण घरात नाही.'
बायकोने सुलेमानला मिठाई आणायला सांगितले असेल, आणि सुलेमानला पगार कमी मिळत असे, तर तो बिचारा मिठाई कुठून आणणार? बायको एक महिन्यापासून सुलेमानला सांगत असते की ह्या सर्व मुलांना, बिचाऱ्यांना खूप ईच्छा आहे. आता तरी मिठाई घेऊन या. मग एके दिवशी बायको खूप चिडली तेव्हा तो बोलला, 'आज तर घेऊन येतो,' मिंयाभाई जवळ उत्तर रोकड आहे, त्याला माहित आहे की, उत्तर उधार ठेवले तर शिव्या देईल. म्हणून सांगतो की आज घेऊन येतो. असे बोलून सुटका करतो. जर उत्तर नाही दिले तर जाते वेळी बायको कटकट करेल. म्हणून लगेचच पोजिटिव उत्तर (होकार) देतो की आज घेऊन येतो, कुठूनही घेऊन येतो. तेव्हा बायकोला वाटते की आज घेऊनच येणार, परंतु जेव्हा तो येतो तेव्हा खाली हात बघून बायको ओरडते. सुलेमान तसा चतुर असल्यामुळे बायकोला समजावतो की, 'यार मेरी हालत मै ही जानता हूं, तुम क्या समझो!' असे एक-दोन वाक्य बोलतो की बायको म्हणते, 'ठीक आहे नंतर कधीतरी आणा.' परत दहा-पंधरा दिवसांनी बायको तक्रार करते तर, 'माझी हालत मलाच माहित.' असे बोलतो आणि बायको खुश होऊन जाते. तो कधीही भांडत नाही.
आणि आपली लोक तर त्यावेळेला म्हणतील की, 'तू माझ्यावर दबाव आणतेस?' अरे, स्त्रीला असे बोलू नको. त्याचा अर्थ असा, तु स्वत:च बोलतोस की, 'तू दबलेला आहेस.' लग्न करतेवेळी सुद्धा तुझाच हात वर असतो, मग ती तुला कशी दबवणार? त्यातून आज तिने दबवले तर आपण शांत रहावे, जो निर्बल आहे तोच चिडणार.
औरंगाबाद मध्ये एक हकीमचा मुलगा आला होता. त्याने ऐकले असेल की दादांकडे काही अध्यात्म ज्ञान समजण्यासारखे आहे. त्यासाठी