________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
आपल्याला मर्यादेत रहायला हवे डाळ चांगली झाली नसेल, भाजी थंड झाली असेल ते सर्व तर नियमांच्या आधीन होत आहे. त्यातून वाटल्यास हळूच बातचीत करावी की 'ही भाजी तर रोज गरम असते, तेव्हा खूप छान वाटते.' अशाप्रकारे बोललात तर ती लगेचच इशारा समजून जाईल.
आमच्याकडे तर घरातही कोणाला माहित नाही की 'दादांना' हे आवडते की नाही आवडत. स्वयंपाक बनवणे हे काही बनवनाऱ्याच्या हाताचा खेळ आहे का? ते तर खाणाऱ्यांचा ताटात व्यवस्थित शक्तिच्या' हिशोबाने येत असते, त्यात तक्रार नाही केली पाहिजे.
५. मालक पाहिजे, मालकीपणा नको लग्नकरण्यापूर्वी मुलगी पाहता, त्यात काही हरकत नाही, पहा पण ती पूर्ण आयुष्यभर जशीच्या तशीच राहणार असेल तर पहा. तशीच राहणार आहे का? जशी पाहिली होती तशीच? परिवर्तन झाल्याशिवाय राहिल ? नंतर जेव्हा परिवर्तन होईल, तेव्हा सहन नाही होणार, व्याकुळता होऊ लागेल. मग जाणार कुठे? फसलो रे बाबा, फसलो..
__ तर मग लग्न कश्यासाठी? तर आपण बाहेरून कमावून आणायचे, ती घरकाम करेल आणि आपला संसार चालेल, आणि धर्म ही चालेल, ह्यासाठी लग्न करायचे आहे. आणि बायको बोलत असेल की एक-दोन अपत्य तर पाहिजे, तर मग तेवढे निराकरण करा, मग राम तुझी माया! परंतु तो तर मग मालक बनायला जातो. अरे मुर्खा, मालक बनायला का चालला आहेस? तुझ्यात बरकत नाही तरी मालक बनायला चालला आहेस! 'मी तर मालक आहे' असे बोलतो! मोठा आला मालक! तोंड तर पहा ह्या मालकाचे! परंतु लोकं तर मालकी हक्क गाजवतात ना?
गायीचा मालक बनून बसला आहे, म्हशीचा पण, परंतु गाय पण तुम्हाला मालकाच्या रुपात स्विकारत नाही. हे तर तुम्ही मनात समजता की ही गाय माझी आहे. तुम्ही कापसाला पण माझे बोलता, 'हा कापूस माझा आहे.' कापसाला तर माहितही नाही बिचाऱ्याला. कापूस तुमचे असते तर तुमच्या हजेरीतच वाढले असते, तुम्ही घरी गेल्यावर वाढले नसते. परंतु हा कापूस तर रात्री पण वाढतो. कापूस रात्री वाढतो की नाही वाढत?