________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
१०७
२५. आदर्श व्यवहार, जीवनात..... दादाश्री : जीवन कसे सुधारावे? प्रश्नकर्ता : खऱ्या मार्गाने गेल्याने.
दादाश्री : किती वर्षापर्यंत सुधारायचे? पूर्ण जीवन? किती वर्ष, किती दिवस. किती तास, कश्याप्रकारे सुधरेल हे सर्व?
प्रश्नकर्ता : माहीत नाही मला.
दादाश्री : हं... म्हणून तर सुधरत नाही ना! खरे तर दोनच दिवसतर सुधारायचे आहे. एक तर वर्किंग डे (कामावर जाण्याचा दिवस) आणि दुसरा, होली डे (सुट्टीचा दिवस). सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे दोनच दिवस सुधारायचे आहेत. ह्या दोन्हीमध्ये फेरफार केला म्हणजे सर्वात फेरफार होईल. दोंघाचीच सेटींग (आयोजन) केली की मग बाकी सर्व त्या प्रमाणे चालेल. आणि त्यानुसार चालल्यावर तर सर्व नीट होईल. लांब लचक फेरफार करायचाच नाही. हे सर्व पण काही दररोज फेरफार करत नाहीत. ह्या दोन्हीमध्ये सेटींग करायची आहे. ह्या दोन दिवसाची व्यवस्था केली की त्यात सर्व दिवस समावलेत.
प्रश्नकर्ता : ही सेटींग कशी करावी?
दादाश्री : का? सकाळी उठलात तर उठल्यावर ज्या भगवंताचे स्मरण करायचे असेल ते करून घ्यावे. एक तर सकाळी लवकर उठण्याची पद्धत ठेवली पाहिजे. कारण की माणसांनी साधारण पाच वाजता उठायला हवे. त्यात अर्धातास स्वत:च्या एकाग्रतेचे सेवन करायला हवे. कोणी इष्टदेव वगैरे जे कोणी असतील, त्यांची भक्ती पण अर्धाएक तास करावी. म्हणजे मग रोजच चालेल असे. नंतर मग उठून ब्रश वैगेरे सर्व करून घ्यावे. ब्रश करण्याची पण शिस्त असावी. आपण स्वत:च ब्रश घ्यावे आणि स्वत:च करावे, इतर कोणाला सांगू नये. आजारी असाल तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. नंतर मग चहा-पाणी येणार. त्यात कटकट नाही करायची, जे काही समोर येईल ते पिऊन घ्यावे. साखर कमी असेल तर चहा पिल्या नंतर त्यांना सांगावे की, साखर जरा कमी होती, उद्यापासून