________________
अहंकार. आरोपित भाव त्याचे नाव अहंकार, 'मी चंदलाल आहे' असे मानतो तोच अहंकार आहे. खरोखर स्वतः चंदुलाल आहे? की चंदुलाल नाव आहे? नावाला 'मी' मानतो, शरीराला 'मी' मानतो, मी पती आहे, ह्या सर्व राँग बिलीफ (चुकीच्या मान्यता) आहेत. खरोखर तर स्वतः आत्माच आहे, शुद्धात्मा आहे पण त्याचे भान नाही, ज्ञान नाही म्हणून मी चंदुलाल, मीच देह (शरीर) आहे असे मानतो. हीच अज्ञानता आहे! आणि याच्यानेच कर्म बांधले जाते.
छुटे देहाध्यास तो नही कर्ता तू कर्म, नही भोक्ता तू तेहनो ए छे धर्मनो मर्म। - श्रीमद राजचंद्र। जो तू जीव तो कर्ता हरी, जो तू शिव तो वस्तु खरी।
- अखा भगत। 'मी चंदुलाल आहे' असे भान आहे त्याला जीवदशा म्हटले, आणि मी चंदुलाल नाही पण मी तर खरोखर शुद्धात्मा आहे ह्याचे भान, ज्ञान वर्तनात येते त्याला शिव पद म्हटले आहे. स्वत:च शिव आहे. आत्मा हाच परमात्मा आहे आणि कोणतीही संसारी क्रिया करण्याचा त्याचा स्वभाव नाही. स्वभावतः आत्मा अक्रिय आहे, असंग आहे. 'मी आत्मा आहे' आणि मी काहीच करत नाही असे निरंतर लक्षात राहते. त्याला ज्ञानी म्हटले आहे आणि त्यानंतर एक ही नवीन कर्म बांधले जात नाही. जनी डिस्चार्ज कर्म फळ देऊन संपत जातात.
मागच्या जन्मी कर्मबीज पेरतो, त्या कर्माचे फळ या जन्मात येते. तेव्हा हे फळ कोण देतो? भगवंत? नाही. निसर्ग देतो. ज्याला परम पूज्य दादाश्री सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स 'व्यवस्थित शक्ति' म्हणतात. ज्या चार्जचे डिस्चार्ज नॅचरली आणि ऑटोमॅटीकली होते. परंतु ते फळ भोगते वेळी अज्ञानतेमुळे पुन्हा आवड-नावड, राग-द्वेष केल्याशिवाय तो रहात नाही. ज्यामुळे तो नवीन बीजं टाकतो. ज्याचे फळ त्याला पुढच्या जन्मी भोगावे लागते. ज्ञानींनी नवीन बीज टाकण्याचे थांबवलेले आहे, ज्यामुळे मागचे फळ पुर्ण होऊन त्यांना मोक्षपदाची प्राप्ती होते!
कोणी आपला अपमान करतो, नुकसान करतो, तो तर निमित्त आहे,
11