________________
भावना सुधारे जन्मोजन्म
७
भाव प्रतिक्रमण तत्क्षणी च
प्रश्नकर्ता : मी जेंव्हा समोरच्याचा अहंकार दुभावला, तेव्हा मला असे होऊन जाते की हा माझा अहंकार बोलला ना?
दादाश्री : नाही तसा अर्थ करायची गरज नाही. आपली जागृति काय म्हणते? हा आपला मोक्षमार्ग म्हणजे अंतर्मुखी मार्ग आहे ! निरंतर आतल्या जागृतितच रहावे आणि समोरच्याचा अहम् दुभावला तर लागलीच त्याचे प्रतिक्रमण करुन घ्यायचे हे आपले काम. तुम्ही प्रतिक्रमण तर एवढे सगळे करतात त्यात एक अधिक ! आम्हालाही जर कधी कोणाचा अहम् दुभावण्याचे होऊन गेले असेल तर आम्ही सुद्धा प्रतिक्रमण करतो.
म्हणून सकाळच्या पहारी असे बोलायचे की, 'मन-वचन-कायाने कोणत्याही जीवास किंचित्मात्र दुःख न हो' असे पाच वेळा बोलून निघावे आणि मग जे दुःख होईल ते आपल्या इच्छे विरुद्ध झाले आहे, त्याचे प्रतिक्रमण करायचे संध्याकाळी.
प्रतिक्रमण म्हणजे काय ? डाग पडला म्हणजे लगेच धुऊन टाकायचा. मग हरकत नाही, मग भानगड, कसली? प्रतिक्रमण कोण नाही करीत ? ज्यांना(अज्ञानरूपी) बेभानपणा आहे, ती माणसं प्रतिक्रमण नाही करीत, बाकी प्रतिक्रमण तर मी ज्यांना ज्ञान दिले आहे, ती माणसे कशी झाली आहेत? विलक्षण पुरुष झाले आहेत, क्षणोक्षणि विचार करणारे, बावीस तीर्थंकरांचे अनुयायी विलक्षण होते ते 'शूट ऑन साईट'च प्रतिक्रमण करीत होते. दोष झाला की लगेच 'शूट' ! आणि आजची माणसे तसे करु शकणार नाही म्हणून भगवानांनी हे रायशी - देवशी, पाक्षिक, पर्युषण मध्ये संवत्सरी प्रतिक्रमण हे सर्व ठेवले.
स्याद्वाद वाणी, वर्तन, मनन...
प्रश्नकर्ता : आता 'कोणाचा ही अहम् नाही दुभावणार अशी