________________
भावना सुधारे जन्मोजन्म
बिचाऱ्याला कोणाचा अहम् दुभावण्याची इच्छा नाही. त्याची स्वता:ची तशी इच्छा नाही तरी सुद्धा होऊन जाते. जेंव्हा जगाच्या लोकांना तर इच्छेसहित होऊन जाते. अर्थात् ही कलम बोलण्याने काय होते की आपला अभिप्राय वेगळा पडून गेला. म्हणून आपण त्या बाजूने मुक्त होऊन गेलो.
अर्थात् ही शक्तिच मागायची. तुम्हाला काही करायचे नाही. फक्त शक्तिच मागायची. अमलात आणायचे नाही हे.
प्रश्नकर्ता : शक्ति मागायची गोष्ट बरोबर आहे. पण आपण असे काय केले पाहिजे की जेणे करुन दुसऱ्यांचा अहम् नाही दुभावणार?
दादाश्री : नाही तसे काही करायचे नाही. ह्या कलमां प्रमाणे तुम्हाला बोलायचे. बस एवढेच. दुसरे काही करायचे नाही. आता तुमच्याकडून जो अहम् दुभावला जातो ते फळस्वरूप ( डिस्चार्ज मध्ये ) अवश्य आलेले आहे. आता जे झाले ते तर 'डिसाईडेड' होऊन गेले आहे. ते थांबवता येणार पण नाही. त्याला फिरवण्यास जाणे हे डोकेफोड आहे फक्त. परंतु हे बोललो म्हणजे मग जबाबदारी नाही रहात.
प्रश्नकर्ता : आणि हे बोलणे खऱ्या हृदयापासून झाले पाहिजे.
दादाश्री : हे तर खऱ्या हृदयानेच सर्व केले पाहिजे. आणि जो माणूस करेल ना, तो खोट्या हृदयाने नाही करणार, खऱ्या हृदयानेच करणार. पण ह्यामध्ये स्वता:चा अभिप्राय वेगळा पडून गेला, हे मोठ्यातले मोठे विज्ञान आहे एक प्रकारचे. या प्रमाणे करायचे नाही, तुम्हाला तर ही नव कलमे बोलायची फक्त. शक्तिच मागायची की 'दादा भगवान' मला शक्ति द्या. मला ही शक्ति पाहिजे. ती शक्ति तुम्हाला प्राप्त होते आणि जबाबदारी मिटून जाते. तर जगत काय ज्ञान शिकविते ? ' असे नका करु.' अरे भाऊ, मला नाही करायचे तरी होऊन जाते. म्हणून तुमचे ज्ञान आम्हाला 'फिट' होत ( जमत नाही. हे तुम्ही म्हणतात, त्याने पुढचे बंद होत नाही आणि आजचे थांबत नाही, अर्थात् दोन्ही बिघडतात. म्हणजे 'फिट' होईल असे पाहिजे.