________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
एकदा दासींचा उत्सव सुरू झाला. ती खिन्न झाली. त्याने विचारले, 'तुला कसले दुःख झाले आहे ?' ती म्हणाली, 'दासींचा उत्सव चालू आहे. माझ्यापाशी पानांफुलांनाही पैसे नाहीत. मैत्रिणीमध्ये माझे हसे होईल.' तेव्हा तो धैर्यगलित झाला. ती म्हणाली, ' ( असे ) धैर्यगलित होऊ नका. येथे धन नावाचा श्रेष्ठी आहे. अगदी सकाळीच जो प्रथम त्याच्या भाग्याची इच्छा करेल त्याला तो दोन सुवर्ण मासे देतो. तेथे जाऊन तुम्ही त्याच्या भाग्याची इच्छा व्यक्त करा.' 'ठीक आहे' असे त्याने म्हटल्यावर तिने लोभाने दुसरा ( कोणी ) जाईल म्हणून भल्या पहाटे त्याला पाठविले. जात असताना कोतवालांनी त्याला (चोर म्हणून) पकडले व बांधले.
_तेव्हा सकाळी त्याला प्रसेनजित ( राजा ) पाशी नेले. राजाने विचारले. त्याने खरी हकिगत सांगितली. राजा म्हणाला, 'जे मागशील ते देतो.' तो म्हणाला, 'विचार करून मागतो.' राजाने 'ठीक आहे' असे म्हटल्यावर अशोकबागेत तो विचार करू लागला, 'दोन माशांनी वस्त्रालंकार होणार होणार नाहीत, तेव्हा शंभर सुवर्ण मोहरा मागेन. त्यानेही घर, गाडीवाहन होणार नाही. तेव्हा हजार मागेन. तेही मुलाबाळांच्या लग्नादींना पुरे पडणार नाही, तेव्हा लाख मागेन. तेही मित्र, स्वजन, बांधव यांचा सन्मान करणे, दीन-अनाथांना दान देणे, विशिष्ट भोगोपभोग भोगणे यांना पुरे होणार नाही, तेव्हा कोटी, शंभर कोटी किंवा हजार कोटी मागेन.' अशा त-हेने विचार करत असता शुभकर्मोदयाने त्याच क्षणी शुभ परिणाम होऊन संवेग निर्माण झाला
For Private And Personal Use Only