________________
प्रसंग चवथा : ५५ अहो म्या अविचारे करोन । येकायेकि नृपाला गुण । बोलिलो उद्धृतवचन । उगविल्या दिन कैसे होईल ॥९३॥ ऐसि चिंता वर्तलि हृदि । तदा ध्यान लावले जिनपदि । निर्भय होवोनि वाक्य वदि । पळतील व्याधि जिन नामे ॥९४॥ नामे उद्धरिला अंजनाचोर | श्रीपाल तरिला सागर । स्वर्गास गेला कुकुर । पंचनमस्कार फल प्राप्ति ॥१५॥ जिन नामाचा विश्वास । दृढ धरोनि साहस । स्मरण करिति धरोनि हर्ष । अंतरि भयास न मानिति ।।९६।। इदि करिता जिनस्मरण । अंबिका देवीचे आसन । होते झाले कंपायमान । स्वावधिज्ञान विचारिति ॥९७| देवि म्हने जिनभक्तावरि । संकष्ट येवोनि पडले भारी । तथे जावोनि सत्वरि । तद्भय दूरि करू त्वरे ॥९८॥ ऐसे विचारोनि मनि । त्या स्थळि गेलि तत्क्षणि । वदति झालि मुनिलागुनि । नमस्कार करोनि तत्पदि ॥९९।। म्हने अहो सद्गुरुनाथा । सम्यक्त्वधारक ज्ञानवंता । दयापालक जिनभक्ता । न करावि चिंता त्वया हृदि ॥१०॥ नृपापुढे केले जे भाषण । तैसेच होइल सत्य जान । करोनिया स्थिरमन । करावे स्तवन जिनसत्पदि ॥१०१॥ चतुर्विंशतितीर्थंकर । स्तवन करिता मनोहर । कुलिंग फुटोनि सत्वर । जिनमहिमा थोर वाढल ||१०२॥ स्वयंभुवा भूतहितेन ऐसे । प्रथमपद देवोनि भर्वसे । जिनगुण चिंतित मनोह्लासे । निज आवासे गेलि त्वरा ॥१०३।। तदा श्री समंतभद्र मुनि । देवतादर्शने करोनि । थोर हर्ष पावला मनि । जिनस्तवनि प्रवर्तला ॥१०४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org