________________
प्रसंग चौरेचाळीसावा । ५८५ पुढील कथेचे निरोपण । कथाकोश तप आराधन । सुभौम राजा गुणीजन । पुण्यवान अष्टमचक्री ।।४०।। श्लोकः-ईंद्र-नागेंद्र-चंद्रार्क-सचित-पद-द्वयं । नत्वा जिनं प्रवक्षेहं, सुभोमेशस्य वृत्तक ।।४१।। ईर्शावतीपुरीचा राजा । कार्तवीर्य कीर्तीची ध्वजा। रेवती कामिनी त्या भाजा । तत् पुत्र राजा सुभोमवाक् ।।४२।। अष्टम चक्रवर्ती गुणी । सर्व ऋद्धीसहित ज्ञानी । पाकनिष्पती चातुर्य मनी । विजैसेन कीयुक्त तो ॥४३॥ एकदा त्यान त्या भूपासी । क्षीरभोजन उष्ण त्यासी । देता क्रोध त्याचे मानसी । तो ठाव त्यासी त्राहाटिला ॥४४।। विजयसेना मृत्यु जाला । क्रोधध्यान वैर बांधला । क्षारसमुद्री व्यंतर जाला । त्या समजला पूर्ववैर ॥४५॥ क्रोधे तापसरूप धरी । मिष्ट फळ घेवोनिया करी। वैर साधु मनी विचारी । आली मंदिरी रायाचे पै ॥४६॥ फळ अपिली तया म्होरे । सुगंध मिष्ट अति सुंदर । स्वाद जानोनी चक्रेश्वर । पुसे वगत्र तापसासी ।।४७।। तेव्हा तापस प्रपंचान । समुद्रतीरा गेला घेवोन । त्याचे करावे हनन । केले स्मरण नौकार चक्री ।।४८।। बळ न चाले व्यंतराचे । कपट समजले तयाचे। चक्री म्हणे मम प्राणाचे । हनन साच करू पाहसी ॥४९।। व्यंतर म्हणे कोठे जासी । आता वधीन मी तुजसी । तेव्हा भयभीत मानसी । शरण त्यासी देहलोभ ।।५।। कुबुधी म्हणे एक करी। नौकार लेही भूमीवरी । पादे पुसशील जरी । सोडीन तरी तुजला मी ॥५१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org