________________
प्रसंग एक्केचाळीसावा : ५४३
सर्व संन्यास करोनिया । वर्धमान चिंति हृदय । श्रीगुरूमंत्र जपोनिया । मरण भयातीत जाले ॥४४॥ श्लोक-मरणोपसर्ग रोगादी, संयोगानष्टवियोगात् । न भयं त्र प्रवेशंती साधूसमाधीश विग्नयाः ॥४५॥ साधु करिताती साधन । उपसर्ग रोगादि मरण । संयोगवियोग समान । समाधीरत तोचि साधू ॥४६॥ तेव्हा तो पणिक साधु मनी । समाधिस्थ तद्रूपचिंतनी । केवळोत्पन्न तत् क्षणी । इंद्र येवोनी पूजताती ।।४७।। मुंडकेवळी जाले देव । साधिले मोक्षाचे वैभव । अचल अढळ तो ठाव । देवाधिदेव जाहला तो ॥४८॥ श्लोक:-श्रीमत् सागरदत्तनाम पणिको स श्रेष्ठिनीनंदनः । पूतात्मा पणिको विलोक्य शिवदं, श्रीवर्धमानं जिनं । ज्ञात्वा स्वल्पतरं निजायुरखिलं त्यत्वा च मोहादिकं । भूत्वा यस्तु मुनिः स मुक्तिमगमत् नित्यं सुखं मे क्रियात् ॥४९॥
कथा ६० साठ श्लोक:-नत्वा जिनं जगत्भद्रं सुरासुरनमस्कृतं । भद्रवाहोर्मुनींद्रस्य, चरित्रं कथ्यते हितं ।।५।। पुंडवर्धन त्या देशात । कोटपे नगर पुण्यवंत । तेथे राजा पुण्यवंत । पद्मरथ तो धर्मात्मा ॥५१॥ त्याचा सोमशर्मा ब्राह्मण । पुरोहित सज्ञान । पुत्र भद्रबाहु सगुण । रूप सद्गुणमंडित तो ॥५२॥ प्रौढ पाहोनीया तो नेत्री । पिता मुंजबंधन करी । एके दिनी गावाबाहेरी । क्रीडा करी नर त्रिदश ॥५३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org