________________
प्रसंग तेविसावा : २९९
यतीश्वर आनि सद्गृहीव्रत । निरोपिले मुनिनाथ । पूर्व पालिजे सार सम्यक्त्व । तद्व्यतिरिक्त सर्व निष्फळ ॥५३॥ ऐसे ऐकोनिया भावे । वंदिति मुनींद्राचे पाय । मुखे शब्द वदति जयजय । आनंद न मावे निज हृदि ॥५४॥ कितियक दीक्षा अंगीकारिति । कितियक गृहस्थ व्रत पालिति । कितियक शुद्ध सम्यक्त्व घेति । यथाशक्ति करोनिया ॥५५।। तदा तो मातंग दुराचारि । मुनिवाक्य ऐकोनि सत्वरि । महत्कंप सुटला शरीरि । पडला धरावरि मूच्छित ॥५६॥ मग सीतवात प्रहारि । सावधान होवोनि सत्वरि । मुनिप्रति वदे वैखरि । देवा मी दुराचारि पाताकि ॥५७॥ स्वामि मी करोनि जीवघात । नित्य पोसितो कुटुंबात । तत्पापाचि नसे गणित । एवभ्र दुःखात भोगावया ॥५८॥ आता कृपा करोनि मजवर । क्वचिन् नियम देवोनि सार । जेन्हे तरे भवसागर । पैले पार होइन ॥५९॥ तदा मुनि वदे रे यमपाल । जरी जीवदया पालिसि निर्मल । जेन्हे पुण्य होय प्रबल । सौख्य सकल भवभवि ॥६०॥ मग मातंग वदे गा गुरूराया । कैसी पालावि जीवदया। ते वदावे मज त्वया । सर्व कळोनिया येइल ॥६१॥ मुनि वदे रे पंचाणुव्रत । अहिंसादि परिग्रहपर्यंत । घेवोनि पालावे सदोदित । जेन्हे भवभवि व्यक्त सौख्य होय ॥६२।। तवर्णन ऐकोनि श्रुति । म्हणे मी मातंग नीच जाति । हे व्रत दुर्घट दिसति । ते कौने रिति पालु स्वामिया ॥६३॥ जे जे व्रत त्याकारण । मुनि वदति स्वल्प पाहून । तौ तौ म्हणे कठिन कठिन । नव्हे मजकुन गुरूराय ।।६४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org