________________
१७६ : आराधना कथाकोष
बहू आस तो दास सर्वा जनाचा ।
नसे आस तो देव इंद्रादिकाचा ॥१९१॥ त्यास्तव तुज मी न मागे फार । तीनपद पृथ्वी देइ लौकर । न लाविजे त्वया उशीर । कार्य सत्वर असे मज ||१९२।। बळि म्हने रे अभागिया । हे काय मागीतले त्वया । कल्पतरू प्राप्त झालिया । का कोद्रव भक्षाया मागिति ॥१९३॥ आता विचारोनि स्वचित्ते । मनविच्छित मागावे मागुते । वामन वदे रे द्यावे माते । पूर्वि जे तूते असे याचिले ॥१९४॥ यथा मर्कट कंठीहार । क्षपिता काढोनि टाकि सत्वर । तैसा अभागि असे जो नर । त्यासि दातार काय करि ॥१९५॥ ऐसे विचारोनि सत्वरि । उदक क्षपिले तत्करि । म्या तुज तीन पदगह्वरि । दिधलि लौकरि ध्यावि त्वया ॥१९६॥ तदा क्रोधे प्रजलिला । त्वरे पद उचलिला । मेरुमस्तकि ठेविला । द्वितीयपद उचलोनि वहिला ।
क्षपिला मानुषोत्तरपर्वति ॥१९७|| तृतियश्चरण धरायाप्रति । क्वचिद्रिक्त न दिसे क्षिति । सर्वांगे प्रजला क्रोधवृत्ति । चरण चालिति भूमंडलि ॥१९८॥ तदा तत्क्षोभे करोनि । धाक पडला त्रिभुवन जनि । नदी सागर पर्वत धरणि । क्षोभ पाउनि भय कंपिति ॥१९९।। ऐसे पाहोनि सुरनर । नारदतुंबळव्यंसर । सर्व करिति हाहाकार । यथा कल्पांतवात प्रहार ।
क्षुभित सागर खळबळिति ॥२०॥ सुरासुर होवोनि भयभीत । त्या स्थळि येवोनि त्वरित । स्वामी क्षमा क्षमा मुखी वदत । तत्पदि करित वंदन पूजा ।२०१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org