________________ तुंबलेला धर्म सारा खळखळुनि झेपावला / वगळलेल्या जनमनांचा शिंपता केला मळा / / महावीरांच्या या क्रांतीपासून स्फूर्ती घेऊन आपणही महावीरवाणी व तिचे चिंतन भारतातील व इतर देशातीलही बोलीभाषांमध्ये प्रभावीपणे आणू या. आपल्या मुलांना मातृभाषेत धर्म शिकवू. इंग्रजीत भाषांतर करून नको. 3) ज्ञानमीमांसा : जैन दर्शनाने ज्ञानाचे पाच भेद सांगितले. मति, श्रुत, अवधि, मन:पर्याय व केवलज्ञान. जैन दृष्टीनेnformation Technology च्या युगात कोणत्याही वैज्ञानिक साधनाने मिळविलेले ज्ञान फक्त माहितीचा धबधबा, महापूर आहे. मति-श्रुत नंतर त्याची मर्यादा संपते. पुढची ज्ञाने बौद्धिक कुवतीशी निगडित नाहीतच. प्रथम सम्यक्त्वाची जोड मिळाली तरच मति-श्रुतही सम्यक् बनते. शुद्ध चारित्राने आध्यात्मिक प्रगती केली, तरच पुढील ज्ञाने आविर्भूत होता. सॉक्रेटिसही knowledge is virtue', म्हणतो तो याच अर्थाने ! 'तो फार ज्ञानी, पंडित आहे. वक्तृत्व उत्तम आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात तो काही का करेना !' हा दृष्टिकोण जैन दर्शनास संमत नाही. शुद्ध आचरण नसलेल्याचे ज्ञान, जैन दर्शनाच्या दृष्टीने पोकळ व आत्मघातक आहे. स्वत: भरपूर परिग्रह करणाऱ्या माणसाचे अपरिग्रहावरील व्याख्यान ऐकून इतर लोक कसे अपरिग्रही होणार ? प्रश्नच आहे. 4) समन्वयवाद : कार्यकारणसिद्धांत असो, सप्तभंगीनय असो अगर आत्मकल्याणाचा मार्ग असो, महावीरांनी इतरांचे सिद्धांत सर्वस्वी फुली मारून कधीच धिक्कारले नाहीत. इतरांच्या प्रतिपादनातील सत्य अंश सतत ग्रहण केले. बौद्ध वाङ्मया जो सतत इतरांवरील टीकेचा सूर दिसतो तसा जैन साहित्यात (विशेषतः आगमात) जवळजवळ नगण्य दिसतो. भगवद्गीतेने ज्ञानमार्ग, संन्यासमार्ग, भक्तिमार्ग, ध्यानमार्ग, कर्ममार्ग असे विविध अध्यायात कथन केलेले दिसतात. जैन धर्माने एकाच आचाराचे दर्शन, ज्ञान, चारित्र, तप व वीर्य असे पाच भेद कल्पिले. भगवती आराधनेने चतुष्कंध आराधना सांगितल्या. उत्तराध्ययनाने 28 व्या मोक्षमार्गगति अध्ययनात स्पष्टपणे नोंदविले - नाणेण जाणई भावे, दंसणेण य सद्दहे / चारित्तेण निगिण्हाई, तवेण परिसुज्झई / / उत्त.२८.३५ उमास्वातींनी पहिल्याच सूत्रात दर्शन, ज्ञान, चारित्राचा समन्वय केला. कुटुंबात, परिवारात, गावात, व्यापारात, सर्व व्यवहारातच समन्वयवादी दृष्टिकोण व्यवहारनयाच्या दृष्टीनेही फायदेशीरच नाही काय ? केवळ नफ्याकडे बघून तत्त्वे गुंडाळून कसेही वागण्याचा समन्वयवाद' नको बरे का ! 5) विवेक व अप्रमाद : आत्मकल्याणाची कास धरलेल्या आराधकासाठी महावीरांनी सतत अप्रमाद (बेसावधपणाचा व बेफिकीरीचा अभाव) सांगितला आहे. गौतम गणधरांसारख्या पारगामी व्यक्तीलाही त्यांनी तो वारंवार सांगितला, तेथे तुमच्याआमच्यासारख्या सामान्यजनांचा काय पाड ? धर्माचरण करताना देहली-दीपन्याया'ने हा विवेकरूपी दिवा तेवत ठेवला तर आपोआपच तोंडून शब्द उमटतात -