________________ 'शौरसेनीतून अर्धमागधी निघाली' - असा दावा करतात. परंतु अद्याप तो सर्वमान्य झालेला नाही. भरताच्या नाट्यसनात अर्धमागधी व शौरसेनी, दोन्ही बोलीभाषांची नोंद घेतलेली दिसते. * 45 अर्धमागधी आगमग्रंथ इसवीसनपूर्व 500 ते इसवीसन 500 या एक हजार वर्षाच्या काळात तयार झाले. यापैकी काही निवडक ग्रंथांनाच खऱ्या अर्थाने 'महावीरवाणी' म्हणता येते. बहुतांशी रचना या उत्तरवर्ती आचार्यमी व स्थविरांनी लिहिलेल्या आहेत. याचमुळे अर्धमागधी भाषेचे वेगवेगळे तीन स्तर श्वेताम्बर आगमांमध्ये दिसतात. * दिगम्बर संप्रदाय असे मानतो की, कोणतेच अर्धमागधी ग्रंथ प्रमाणित महावीरवाणी' म्हणता येत नाहीत. काळाच्या ओघात अर्धमागधी भाषेत अनेक बदल झाले व भर पडली. म्हणून श्वेताम्बर आगमग्रंथ हे 'व्युच्छिन्न' झाले. याच कारणाने दिगम्बर आचार्यांनी दृष्टिवाद' या प्राचीनतम ग्रंथाच्या स्मरणाच्या आधारे शौरसेनी भाषेत नव्याने ग्रंथसना केली. त्यांना आम्नाय, आगम किंवा वेद म्हटले गेले असले तरी त्यांचे कर्तृत्व विशिष्ट विशिष्ट आचार्याकेज जाते. * अर्धमागधी आगमग्रंथांची विभागणी अंग, उपांग, मूलसूत्र, छेदसूत्र इत्यादी प्रकारे करतात. दिगंबरीय ग्रंथांची विभागणी प्रथमानुयोग (कथानुयोग), करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग या चार अनुयोगांमध्ये करतात अध्ययन-परंपरेत मात्र श्वेताम्बर हे मूलसूत्रांपासून आरंभ करतात तर दिगम्बर प्रथमानुयोगापासून करतात. * देवर्धिगणि क्षमाश्रमण यांच्या नेतृत्वाखाली, पाचव्या शतकामध्ये झालेल्या तिसऱ्या आगमवाचनेमध्ये, सर्व अर्धमागधी आगम प्रथम ग्रंथारूढ झाले म्हणजे लिखित स्वरूपात आले. त्यापूर्वी ते मौखिक परंपरेने जपलेले होते. 'षट्खंडगम' हा शौरसेनी भाषेतील पहिला दिगंबर ग्रंथ जेव्हा रचला गेला तेव्हाच म्हणजे पहिल्या शतकातच लिखित स्वरूपात अस्तित्वात आला. त्यानंतरही भगवती आराधना व कुन्दकुन्दांचे समग्र साहित्य ग्रंथारूढ स्वरूपातच प्रचलित झाले. त्यामुळे अर्थातच लिखित स्वरूपात जैन सिद्धांतविषयक साहित्य आणण्याचा पहिला मान दिगंबर परंपरेला दिला जातो. * दिगंबरीयांच्या शौरसेनी साहित्याचे स्वरूप मुख्यत: सैद्धांतिक अर्थात् तत्त्वप्रधान आहे. श्वेतांबरीय आगमसाहित्या मात्र विषयांची विविधता दिसते. उदाहरणार्थ - आचारांग(१) हा ग्रंथ औपनिषदिक शैलीत लिहिलेला अध्यात्मप्रधान ग्रंथ आहे. स्थानांग व समवायांग हे कोशवजा ग्रंथ आहेत. व्याख्याप्रज्ञप्तीतून महावीरांचा समकालीन इतिहास समजत 'नायाधम्मकहा' ग्रंथात अनेक सरस कथा व दृष्टांत आहेत. उपासकदशा, अंतगडदशा व विपाकसूत्र हे कथाप्रधान ग्रंथ आहेत. उत्तराध्ययनात तत्त्वज्ञान, आचरण, आख्यान, संवाद यांना प्राधान्य आहे. एक उत्कृष्ट श्रमणकाव्य' म्हणूनही त्याचा गौरव केला जातो. याखेरीज उपांगांमध्ये खगोल, भूगोल व प्राणिशास्त्र, जीवशास्त्रविषयक निरीक्षणे नोंदविली आहेत. हे चार विषय दिगंबर परंपरेतील तिलोयपण्णत्ति व गोम्मटसार या दोन ग्रंथात येतात. परंतु हे दोन्हीग्रंथ अर्धमागधी उपांगग्रंथांच्या रचनेच्या काळानंतरचे आहेत. * श्वेतांबर जैनाचार्य तिसऱ्या-चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत सातत्याने जैन महाराष्ट्री या प्राकृतभाषेत लिहित राहिले. वाड्.मयाचा प्रकार व विषय या दृष्टीने त्यात खूप विविधता राहिली. या ग्रंथांची संख्या शेकड्यंनी असली तरी वाड्.मयीन मूल्य असलेले व भारतीय संस्कृतीच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारे मोजके ग्रंथ यामध्ये उहेत. एकंदरीत भारतीय साहित्याला योगदान ठरणारे ग्रंथ व त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -