SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 72
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ दीर्घ जीवनाचा असा भेद का दृष्टीस पडावा ? त्याचप्रमाणे ईश्वरानेच जग बनविलेले असेल तर मनुष्य कर्तृत्वशून्य होईल. ईश्वर ज्ञानी असल्यामुळे त्याने हिंस्र व दुष्टप्राणी केव्हांच वनविले नसते. त्यानेच दैत्यांना उत्पन्न केले व तोच त्यांचा नाश करतो यामुळे तो पापी कसा बरे होणार नाही ? दैत्य हे दुष्ट निघून सजनांचा छल करतील हे त्यांस माहीत झाले नसावें. माहीत झाले असते तर त्यांना बनविण्याचे त्याचे सर्व श्रम वाचले असते व जगास त्याच्या अज्ञतेचा परिचय झाला. नसता. इत्यादि गोष्टींचा विचार केला असतां ईश्वराने सर्व पदार्थ उत्पन्न केले नाहीत हे सिद्ध होते. मनुष्यालाच काय प्राणिमात्रांना देखील जें सुख किंवा दुःख मिळतें तें पूर्वोपाजित शुभाशुभ कमांमुळे मिळत असते. श्रीमान् व दरिद्र घुद्विवान व मूर्ख, कुरूप व सुंदर अशी जी माणसे दिसून येतात, ती सर्व शुभाशुभ कर्मानें तशी झालेली आहेत. यामुळे, अजो जंतुरनीशोऽयमात्मनः सुखदुःखयो। ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्ग या श्वश्रमेव वा ॥ १॥ या श्लोकांत सर्व प्राणी अज्ञ आहेत व आपल्याला सुख व्हावें दुःख होऊ नये, अशी त्यांची इच्छा असली तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. ईश्वर सर्व सत्ताथीश आहे, तो प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वर्गास किंवा नरकास पाठवित असतो, हे झणणे सर्वथा असत्य आहे. जर ईश्वरच नरकास किंवा स्वर्गास पाठवितो, मनुष्य जर असमर्थ आहे तर या लोकी माणसें जी वाईट कम करतात, ती कमैं ईश्वरच करीत असला पाहिजे कारण माणसें सर्वथा, असमर्थ आहेत. यामुळे ईश्वर पातकी असल्यामुळे मनुष्यास दंड करणे अन्यायाचे ठरेल. वास्तविक पाहतां ईश्वरासच दंड केला पाहिजे तोच दंडनीय आहे. यास्तव ईश्वरास जगत्कर्ता किंवा Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003839
Book TitleSwayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Original Sutra AuthorN/A
AuthorSamantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
PublisherSakharam Nemchand Doshi
Publication Year
Total Pages314
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy