________________
( ३२ )
तदनंतर योग्यानें आपली हकीकत राजाच्या आग्रहावरून सांगि• तली. (मल्लित्रेण प्रशस्तीमध्ये ही हकीकत आली आहे, मागें हिचें वर्णन आले आहे. तेथें पाहावें. ). योग्यानें आपली हकीकत सांगून आपलें पूर्वीचें स्वरूप प्रगट केलें अर्थात जैन मुनिवेष स्वीकारला. हातांत मयूर - पिंछी धारण केली. तदनंतर अनेक वाद्यांचा पराभव करून जैनशासनाची प्रभावना सर्वत्र केली. हे आचार्य पुढें तीर्थकर होणार आहेत. याबद्दलचा उल्लेख हस्तिमल कवीने केला आहे. याचे वर्णन मागें केलें आहे. तसेच भविष्यकाली तीर्थकर कोणकोण होणार आहेत याविषयीं अशी एक गाथा आहे
अह हरी व पडिहरि चक्किचउकंच एय बलभद्दो । सेणिय समंतभदो तित्थयरा हुंति नियमेण | अर्थः- आठ नारायण, नऊ प्रतिनारायण, चार चक्रवर्ती व एक शेवटचा बलिभद्र, श्रेणिक राजा व समंतभद्राचार्य हे भविष्यकालीं ती र्थकर होणार आहेत. पुढे शिवकोटि राजा हा आचार्यांचा शिष्य झाला त्यानें दिगंबर दीक्षा घेतली व आचार्याजवळ जैन धर्मांतील तत्वाचे अध्ययन करून भगवती आराधना नांवाचा प्राकृत भाषेत एक अत्युत्तम ग्रंथ बनविला.
याप्रमाणे आचायांचे चरित्र संपलें आचार्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले याचाही उल्लेख मार्गे केलाच आहे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org