________________
( २१५ )
प्रतिक्षणं क्षण प्रति । इति एवं यद्वचनं तत्ते तब जिन सकलज्ञलांछन सर्वज्ञताचिह्नं । किंविशिष्टस्य ते वदतां वरस्य । वदतां तत्वमुपदिशत मध्ये वरस्य श्रेय |
•
अर्थ - हे मुनिसुव्रतनाथ जिनेश, आपण तत्वांचा उपदेश करणा या गणधरादिकांमध्यें श्रेष्ठ आहांत व प्रतिक्षणी जगांतील वेतन पदार्थांच्या स्थिति, उत्पत्ति व विनाश ह्या तीन अवस्था होतात असा आपण उपदेश केला. या उपदेशावरूनच आपण सर्वज्ञ आहांत हैं ठरते. हा आपला उपदेश सर्वज्ञपणाचे चिह्न आहे.
तात्पर्य -- कित्येक लोक पदार्थ क्षणिकच मानतात, कि. स्येक पदार्थ नित्य आहेत असे समजतात. व कित्येक पदाथीची उत्पत्ति हमेशा होते असें समजतात. परंतु प्रतिक्षणीं उपरोक्त तीन अवस्था पदार्थामध्ये होतच असतात. प्रत्येक पदार्थाच्या पूर्व अवस्थेचा नाश होतो, नवीन अवस्था उत्पन्न होते व या दोन अवस्थेमध्ये पदार्थ आपली स्थिरता राखीत असतो. अणून पदार्थ या तीन अवस्थांना धारण करीत असतो. जसे समुद्रामध्ये एक लाट उत्पन्न होते, तिला विनाश होऊन तिचें दुसन्या लाटेमध्यें परिणमन होतें. परंतु लाटेच्या उत्पत्ति व विनाश या दोन अवस्थामध्यें जल कायम असतें. जसें जलामध्ये ह्या तीन अवस्था दृष्टिगोचर होतात तशाच या तीन अवस्था सर्व पदार्थामध्यें प्रतिक्षणी होत असतात. असा उपदेश श्री मुनिसुव्रतनाथ जिनांनीं भव्यांना केला ह्मणून त्यांच्या या उपदेशावरून ते सर्वज्ञ होते हैं ठरतें.
भगवतोऽपायप्राप्तिप्रतिपादनपूर्वकं स्तोता स्तुतेः फलं याचमानः प्राह ।
श्री मुनिसुव्रतनाथ देखील प्रथम अष्ट कर्मसहित होते; तदनंतर कर्मांचा नाश करून त्यांनी मोक्ष मिळविला. मला देखील
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org