________________
'मनुष्याचें स्वाभाविक अन्न'
आपले शरीर हैं एक प्रकारचें यंत्र आहे. यंत्राचा कांहीं भाग त्याच्या गतीमुळे घासून जातो; त्याप्रमाणें आपल्या शरीरांबील अवयवांचा भाग श्रमामुळे शक्तिहीन होतो. शक्तिहीन होणारा भाग पूर्वीप्रमाणे भरून काढण्याकरितां आपणांस अन्न खाण्याची अत्यंत जरूर आहे. यंत्राचे भाग नीट सुरळीत चालण्यासाठी वारंवार त्यास तेल द्यावें लागतें; त्याचप्रमाणें मानवी शरीररूपी यंत्राचे भागास देण्यासाठीं रुधिररूपी तेलाची अत्यंत अवश्यकता आहे व त्याची उत्पत्ति अन्नापासून होतें. आपण जे पदार्थ खातो; त्या पदार्थामध्ये असा एक गुण आहे कीं, शरीरास बळकटी आणून अंगांत उष्णता उत्पन्न करतो व ती उष्णता शरी रांत कायम टिकून तीपासून चरत्री उत्पन्न होऊन रक्ताची वृद्धि करतो. तसेंच हाडास वळकटी आणण्यास कणखर पदार्थाची
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com